Manoj Jarange: लग्नासाठी मुलीचे बाप आणि मुलाचे बाप मोठा खर्च करतात. ते पैसे एकत्र करुन मुलाला व्यवसायासाठी दिले पाहीजेत,असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. लग्नात हुंडा (Dowry in marriage) देण्याच्या मुद्यासंदर्भात जरांगे यांनी हे भाष्य केलं. हुंड्याचं परिवर्तन व्यवसायात (Business) झालं पाहिजे. खोटी प्रतिष्ठा काही कामाची नाही. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला लावा,असेही जरांगे म्हणालेत.
नक्की वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो
शिवराज्याभिषेक सोहळ्याला मी रायगडावर जाणार असल्याचे मत देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. देशमुख कुटुंबही रायगडावर जाणार आहे. आज कुठली बैठक नाही, फक्त चर्चा करत आहोत. मराठा आणि कुणबी एक आहे, असा सरकारनं जीआर काढला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
२९ ऑगस्टला मुंबईला जाणार -जरांगे (Manoj Jarange)
२९ ऑगस्टला मुंबईला जाणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात जातीय दोष आहे का नाही ? हे पाहावं लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले. आता चार महिने वेळ दिला आहे. फडणवीस यांना दोन वर्ष झालं वेळ दिला. मराठा आणि कुणबी एक आहे, त्यांनी जी आर काढला पाहिजे असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या तरुणांवर अनेक केसेस तशाच आहेत. त्या मागे घेतल्या नाहीत. मी आता मुंबईत जाणार आहे. त्यानंतर मी माघारी जाणार नाही, मुंबईत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ५८ लाख लोकांच्या नोंदी आहेत. आम्ही दीड वर्ष वेळ दिला आहे. आता मुंबई सोडणार नाही,असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांसमोर देवेंद्र फडणवीस उघडे पडणार असल्याचे जरांगे म्हणालेत.
अवश्य वाचा : ‘लाडक्या बहिणींना सरकारने केवळ मतांसाठी चटक लावली’- यशोमती ठाकूर
‘फडणवीस विचित्र माणूस’ (Manoj Jarange)
देवेंद्र फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजुला केला पाहीजे. मराठा आणि कुणबीचा जीआर काढावा,असे मनोज जरांगे म्हणाले. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. फडणवीस यांनी आया बहिणींची डोकी फोडली म्हणून फडणवीस यांच्या विरोधात बोलतो, असेही मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांनी देशमुख प्रकरण संपूर्ण संपवलं आहे. त्या प्रकरणाची पूर्ण वाट लावली आहे. फडणवीस यांनी ठरवून सगळं संपवल्याचे जरांगे म्हणाले.