Manoj Kumar Katiyar: पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो;भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा 

0
Manoj Kumar Katiyar: पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो;भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा 
Manoj Kumar Katiyar: पाकिस्तान पुन्हा पहलगामसारखा हल्ला करू शकतो;भारतीय वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा इशारा 

Manoj Kumar Katiyar: “पाकिस्तानमध्ये (Pakistan) भारताशी थेट लढण्याची क्षमता नसल्यामुळे तो पुन्हा एकदा पहलगामसारखा हल्ला(Pahalgam Attack) करण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र, त्यांनी तसं केल्यास भारत पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरसारखी मोहीम राबवेल आणि यावेळी भारताचं प्रत्युत्तर अधिक भयंकर असेल, असं वक्तव्य भारताचे वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल कटियार (Manoj Kumar Katiyar) यांनी जम्मूमध्ये (Jammu) पत्रकारांशी बोलताना केले आहे.

नक्की वाचा: पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात आम्ही त्यांच्या चौक्या, हवाई तळ आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. आपण चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी आपल्याला सतर्क राहावं लागेल कारण ते पुन्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतात.”

अवश्य वाचा: सोन्याची रेकॉर्डब्रेक भरारी! १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

“भारताची प्रत्युत्तरात्मक कारवाई अधिक व्यापक व मोठी असेल”(Manoj Kumar Katiyar)

माजी लष्करी जवानांना संबोधित करताना वेस्टर्न आर्मी कमांडर जनरल कटियार यांनी सांगितले की, “पाकिस्तानने कुठलाही प्रयत्न केला तर भारताचं प्रत्युत्तर खूप भयंकर असेल. आपलं प्रत्युत्तर हे भयंकरच असलं पाहिजे. याबाबत कुठलीही शंका असू नये. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. मला विश्वास आहे की, पाकिस्तानविरोधात भारताने यापूर्वी केलेल्या कारवायांपेक्षा यावेळी भारत अधिक  मोठी व व्यापक कारवाई करेल.”

पाकिस्तान सुधारणार नाही : कटियार (Manoj Kumar Katiyar)

“पाकिस्तान कधीच सुधारणार नाही. तो त्याच्या दुष्ट कारवाया करत राहणार. कारण त्यांच्याकडे भारताशी थेट लढण्याची क्षमता व धाडस नाही. असं असलं तरी भारतीय लष्कर त्यांचे सगळे मनसुबे निष्फळ करण्यास सज्ज आहे. कारण आपल्याला आपल्या जनतेचा पाठिंबा आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली होती. त्यावेळी देखील भारतीय सैन्याला लोकांचा आणि प्रामुख्याने माजी सैनिकांचा पाठिंबा होता.”