Maruti Chitampalli : नगर : मारुती चितमपल्ली (Maruti Chitampalli) हे नवे गावबांधचे सुपूत्र माधवराव पाटील डोंगरवार यांनाच आपले गुरू मानत असतं. त्यांनीच आपणास जंगल वाचवायला शिकवले, असे सांगतं. वनअधिकारी (Forest Officer) म्हणून विदर्भातील वेगवेगळ्या जंगलातील पशु-पक्षांचे अनुभव त्यांनी आपल्या विविध पुस्तकांमधून लिहिल्यामुळे मराठी (Marathi) सारस्वताचे दालन तर समृद्ध झालेच त्याच बरोबर जिवंत निसर्ग (Nature) मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचला, असे प्रतिपादन महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष व मानव वन्यजीव रक्षक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी केले.
अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे
शहरातील पर्यावरणप्रेमींच्या वतीने श्रद्धांजली अर्पण
महाराष्ट्राचे अरण्यऋषी सोलापूरच्या ७९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निसर्ग लेखक दिवंगत पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना अहिल्यानगर शहरातील निसर्ग पर्यावरणप्रेमींच्या वतीने भुईकोट किल्ला परिसरात काल (ता. २२) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी चितमपल्ली यांच्या लेखनाची आणि पशु-पक्षींची आवड उपस्थितांना करून दिली.
नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली
अनेक निसर्गप्रेमी उपस्थित (Maruti Chitampalli)
चितमपल्ली यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांची आठवण उपस्थितांनी करून दिली. तसेच त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची आणि नुकत्याच मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराची नोंद निसर्ग प्रेमींनी घेतली. यावेळी कॅप्टन प्रभाकर चौधरी व डॉ. कुऱ्हाडे यांनी चितमपल्ली यांंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उपस्थित निसर्गप्रेमींनी प्रतिमेला फुले वाहून या अरण्यऋषीला श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली सभेसाठी ऋषीकेश लांडे, राजेश परदेशी, अजिंक्य सुपेकर, राजेंद्र प्रसाद स्वामी, छायाचित्रकार संजय वाघ, जालिंदर बोरुडे, संजय खडके, नरेंद्र सोनी, निलेश मिसाळ, नरेंद्र वाघुंबरे, लक्ष्मीनिवास सारडा, गजानन दळवी, नरेश सुपेकर आदी निसर्गप्रेमी उपस्थित होते.