Mukul Kanitkar : नगर : पूर्ण जगात वैचारीक शोध होत आहे. २१ व्या युगात सर्वात मोठा संघर्ष स्व बोधचा होत आहे. सर्व विश्व प्रतेक देश आपलेच विचार सर्वोत्तम असल्याचे जगात ठणकावत आहे. त्यामुळे करोडोंचे रक्त सांडले आहे. यात काही शक्तिशाली देशांचे, इस्लामी (Islam) व कम्युनिझम (Communism) विचारांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे पूर्ण जगात अशांतता पसरली आहे. भारत (India) अनादी अनंत काळापासून पूर्ण जगाला सांगत आला आहे की विविधताही विश्वाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे दुसऱ्याला माझ्यासारखे बनवण्याची गरज नाहीये. संत ज्ञानेश्वर माउलींही परब्रह्माकडे पसायदान मागताना “जो जे वांछील तो ते लाहो” व विश्व स्वधर्म सूर्यें पाहो हे सर्वात मोठे मागणे मागून जगाचे कल्याण केले आहे. हा भारताचे मूलमंत्र आहे. भारत कायम विश्वाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असल्याने हे भारताचे विश्वबंधुत्व आहे. त्यामुळेच भारत आपल्या संस्कृतीचा पूर्ण जगात प्रसार करत आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ मुकुल कानिटकर (Mukul Kanitkar) यांनी केले.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेत चतुर्थ पुष्प
विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेत चतुर्थ पुष्प प्रसिद्ध विचारवंत व शिक्षणतज्ञ मुकुल कानिटकर यांनी स्व बोध या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे मोहटादेवी देवस्थानचे माजी विश्वस्त ॲड. रमेश वाकळे, जनकल्याण रक्तकेंद्राचे कोषाध्यक्ष अनिल धोकरीया, विचार भारतीचे मार्गदर्शक रवींद्र मुळे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
अवश्य वाचा : पर्यावरण रक्षणासाठी विघटनशील प्लास्टिक हेच भविष्य : मुख्यमंत्री
कानिटकर पुढे म्हणाले, (Mukul Kanitkar)
स्वामी विवेकानंद यांनी आंतरराष्ट्रीय सभेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्राचे एक व्रत आहे. त्यावरच ते चालले पाहिजे. संदेश, नियती व व्रत या तिघांना मिळवून राष्ट्राचा स्वधर्म बनतो. हे त्यांनी सांगितले. भारताचा धर्म स्व बोध आहे. हा स्व बोध जागृत होण्यासाठी भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण या सहा गोष्टींमध्ये स्वचे आचरणास प्रारंभ करून स्व बोधला जीवनात आचरणात आणा तेव्हाच सर्वांचे धर्म ब पुरुषत्व जागृत होईल.
यावेळी रवींद्र मुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या काळातील स्वयंसेवक ग.म.मुळे यांच्या कार्याची माहिती दिली. मिलिंद कुलकर्णी यांनी परिचय दिला. सुधीर लांडगे यांनी आभार मानले.