Murder : वकील दाम्पत्य हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत

Murder : वकील दाम्पत्य हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत

0
Murder : वकील दाम्पत्य हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत
Murder : वकील दाम्पत्य हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीत

Murder : नगर : राज्यात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य खून (Murder) प्रकरणाची तिसऱ्या दिवशी सुनावणी आज अहिल्यानगर येथील न्यायालयामध्ये झाली. सरकारी पक्षातर्फे या घटनेतील माफीच्या साक्षीदाराची आज (ता.११) पुन्हा न्यायालयासमोर (Court) तपासणी झाली. पोलिसांनी (Police) आपल्याला कोणतेही प्रकारचे काही लालूच दाखवलेली नाही, तसेच मी कोणाच्या दबावाला बळी न पडत माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे, असे माफीचा साक्षीदार (Witness) हर्षल ढोकणे याने ठामपणे न्यायालयासमोर स्पष्ट केले. दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी ६ जानेवारी २०२५  रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नक्की वाचा : विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे अहिल्यानगरला स्वागत

राज्यभर गाजलेले खून प्रकरण

राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ॲड. राजाराम जयवंत आढाव (वय ५२) व ॲड. मनीषा आढाव (वय ४२) यांच्या खून प्रकरणाची सुनावणी अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू आहे. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे हा आहे. या प्रकरणात किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे हे आरोपी आहेत.

अवश्य वाचा : कुर्ल्यात बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; ७ मृत्यू तर ४८ जण जखमी

माफीच्या साक्षीदाराची घेतली उलट तपासणी (Murder)

या घटनेतील माफीचा साक्षीदार हर्षल याची बुधवार (ता.११) रोजी उलट तपासणी वकील सतीश वाणी यांनी घेतली. वाणी यांनी हर्षलने दोन दिवसांत दिलेल्या जबाबाच्या आधारावर प्रश्न विचारले. वाणी यांनी हर्षलला घटना घडल्यापासून तू कशा पद्धतीने वागला, तू कुठे गेला होता. तुझ्यासमवेत कोण होते. तू घटना घडली त्यावेळेला कोणते कपडे परिधान केले होते. तसेच इतर आरोपींनी सुद्धा कोणते कपडे घातले होते. तुझ्या समवेत जो काही मोबाईल होता, तो किती वेळ सुरू ठेवला. तू ज्यावेळेला घटना घडल्यानंतर फरार झालेला होता. त्यावेळेला तू ज्या ज्या ठिकाणी गेला तेथून जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन जबाब दिला होता का? आदी प्रश्न त्यांनी हर्षल याला विचारले.

यावेळी उत्तर देताना हर्षल याने सांगितले की, मी या गुन्ह्यामध्ये होतो. माझ्याबरोबर उर्वरित हे चार आरोपी सुद्धा होते. याची माहिती काल जबाबात दिली आहे. मला पोलिसांनी सुरुवातीला नगर येथून ताब्यात घेतले. ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. ते मला राहुरी पोलीस ठाणे येथे घेऊन गेले. या ठिकाणी आणल्यानंतर आजपर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्यात असल्याचे त्याने सांगितले.

यावेळी जो काही जवाब दिलेला आहे. या संदर्भात मी अगोदर पोलिसांना कोणतीच माहिती दिलेली नव्हती. मी घटना घडल्यानंतर माझ्या गावापासून मी पळून गेलो. त्यानंतर मी नगर या ठिकाणी आलो. नेप्ती नाक्याहून कल्याण मार्गे बसने गेलो,  कल्याण येथे पहाटे पोहोचलो. त्यावेळी माझा मोबाईल फोन पहाटे सहा वाजेपर्यंत बंद होता. त्यानंतर तो फोन चालू बंद करत होतो, असे हर्षलने स्पष्ट केले. वकील वाणी यांनी त्याला विचारले की, जवळ पोलीस ठाणे होते का? तेव्हा तू या गुन्ह्याबाबत मला पश्चाताप होत आहे, असे पोलिसांना जाऊन सांगितले होते का?, असे वाणी यांनी विचारले. हर्षलने नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर मी पुन्हा नगरला आलो. तेव्हा मला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुरी या ठिकाणी आणल्याचे हर्षलने सांगितले.


हर्षलने पुढे सांगितले की, पोलिसांच्या ताब्यात असताना या घटनेचा पश्चाताप झाला हे मी राहुरी पोलिसांना सांगितले नाही. ज्यावेळेला मला न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केले त्यावेळेला मला या घटनेचा पश्चाताप झालेला आहे, असे मला त्यांना सांगायचे होते. म्हणून मी अर्धा तास अगोदर त्यांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी स्वतःहून हे सर्व काही लिहून देत आहे, असे मी त्यांना सांगितले. व सर्व घटनाक्रम मी त्यांना न्याय दंडाधिकाऱ्यांच्या समोर सांगत असताना त्या ठिकाणी इतर कोणीही नव्हते व त्यांनी त्यांच्याजवळ फक्त एक टायपिस्ट होता व त्यांनी हा सर्व जबाब घेतला व त्यानंतर मला तो सांगितला. त्यानंतर मी त्यावर स्वाक्षरी केली, असेही आरोपी हर्षल ढोकणे त्याने स्पष्ट केले.

या संदर्भातील उलट तपासणी सुरू असताना आरोपीचे वकील वाणी यांनी तुझा व या आरोपींचा कुठेही काही संबंध नाही, तुला पोलिसांनी अमिष  दाखवले आहे,  माफीचा साक्षीदार करतो व तुझी शिक्षा सुद्धा कमी करतो, असे म्हणत त्यांनी तुला दमदाटी केली हे बरोबर आहे का? असे विचारल्यानंतर माफीचा साक्षीदार हर्षल याने असे काहीही झालेले नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले.
वकील वाणी यांनी उलट तपासणी घेतली त्यावेळी हर्षल म्हणाला, मी एटीएम कार्ड ओळखतो. ते कार्ड वकील दाम्पत्याचेच आहे. मी ज्या वेळेला चार दिवस बाहेर होतो. त्या वेळेला मी फक्त एक ते दीड हजार रुपये वापरले असल्याचे त्याने न्यायालयासमोर सांगितले. तसेच या घटनेमध्ये जी वस्तू त्यामध्ये सोन्याचे कडे आहे. ते त्याने ओळखले. ती बांगडी नसल्याचेही त्याने सांगितले. मला ज्या वेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते त्यावेळेला सीआयडीने माझे सर्व बाजूने फोटो काढले असल्याचे त्याने सांगितले. तसेच यावेळी वकील वाणी यांनी पोलिसांनी तुझ्या हाता व पायाचे ठसे घेतले का असे विचारले असता आरोपी हर्षल याने सांगितले की, पोलिसांनी माझे हाताचे पायाचे ठसे घेतलेले नाही. तसेच मी कोणताही शर्ट किंवा पँट पोलिसांकडे जमा केले असल्याचे त्याने सांगितले.

असे गमचे बाजारात भेटतात
वकील वाणी यांनी गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा गमचा काल दाखवलेला होता. तो आज उलट तपासणी मध्ये त्याला ओळखण्यास सांगितला. यावेळी आरोपीचे वकील वाणी यांनी हा गमचा नवीन आहे, सांगितले. यावर हर्षलने नकार दिला. यावेळी वकील वाणी म्हणाले की, गमचे हे इतर ठिकाणी बऱ्याच दुकानांमध्ये, रस्त्यावर मिळतात. यावर आरोपी हर्षल याने रस्त्यावर नाही तर दुकानात मिळतात, असे सांगितले, व आपण हा गमच्या ओळखत असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

निकम सारखे उठतात त्यामुळे गफलत होते : वकील वाणी

उलट तपासणीमध्ये आरोपीचे वकील वाणी यांनी माफीचा साक्षीदार हर्षलला प्रश्न विचारला किंवा दोन ते तीन प्रश्न एकत्र विचारल्यावर त्याला सरकारी वकील उज्वल निकम यांनी आक्षेप घेतले. काही प्रश्न हे विनाकारण विचारत आहे, असे सांगितले. त्यावेळेला न्यायालयाने हस्तक्षेप करत त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याला उत्तर देऊ द्या, असे सांगितले. त्यावेळी वकील वाणी म्हणाले, निकम साहेब उठल्यानंतर तो आरोपी मला काहीच आठवत नाही, असे म्हणतो, असे सांगितल्यावर न्यायालयामध्ये एकच हशा पिकला.