Nashik-Pune Railway : संगमनेर : मुंबई नाशिक पुणे या सुवर्ण त्रिकोणामध्ये संगमनेर येत असून नाशिक पुणे रेल्वे (Nashik-Pune Railway) करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी नाशिक पुणे रेल्वे चा मार्ग बदलला असून कोणतेही तांत्रिक कारण न सांगता संगमनेर जुन्नर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्याकरता मोठे जल आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी म्हटले असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
संगमनेर सह सिन्नर, चाकणच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
नाशिक पुणे रेल्वे ही शिर्डी अहिल्यानगर मार्गे पुणे जाणार अशी घोषणा लोकसभेमध्ये रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. यानंतर संगमनेर सह सिन्नर नारायणगाव चाकण या भागामध्ये नागरिकांमध्ये मोठी तीव्र नाराजी पसरली यानंतर संगमनेर मध्ये सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने बैठकीत जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.

अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
सर्व संघटना व राजकीय पदाधिकारी उपस्थित (Nashik-Pune Railway)
व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत मोठा जल लढा उभारण्यासाठी यलगार पुकारण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित तांबे, राजाभाऊ आवसक, हिरालाल पगडाळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री, डॉ. मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज करपे, अमर कतारी , संजय फड, संध्या खरे, सोमेश्वर दिवटे ,अजय फटांगरे, निखिल पापडेजा, पप्पू कानकाटे, वसीम शेख, इसाक खान पठाण, किसन भाऊ हासे, राजेंद्र चकोर, सुरेश झावरे, अनिकेत घुले, दत्ता ढगे, यांच्यासह संगमनेर मधील सर्व संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर साठी अत्यंत महत्त्वाची असून बाळासाहेब थोरात यांनी या रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. रेल्वे मंजूर झाल्यानंतर या भागातील भूसंपादन करण्यात आले, याचबरोबर शेतकऱ्यांना त्याची पैसेही देण्यात आले. मात्र, राजकीय डाव साधत जीएमआरडीचे कारण सांगून रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा घाट घातला जात आहे. जगामध्ये पंधरा ठिकाणी जीएमआरडीच्या प्रोजेक्ट जवळून रेल्वे गेलेली आहे. त्यामध्ये कुठलीही अडचण झालेली नाही. याचा कोणताही अभ्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी केलेला नाही. हा पुण्यावरून पुलतांबा असा उलटा प्रवास असून नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मंचर चाकण मार्गे झाली पाहिजे, यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.
उद्यापासून तातडीने संगमनेर तालुक्यात सह्यांची मोहीम डिजिटल कॅम्पिंग व ऑनलाईन पिटिशन दाखल करण्यात येणार असून यामध्ये सर्व नागरिकांनी राजकारण विरहित सहभाग घेऊन संगमनेर रेल्वेसाठी आपला सक्रिय सहभाग द्यावा, अभी नही तो कभी नही त्यामुळे आता प्रत्येकाचा सहभाग गरजेचा असून राजकीय कार्यकर्त्यांवर केसेस दाखल असणे हे मेडल प्रमाणे असते, त्यामुळे सर्वांनी सहभाग घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हिरालाल पगडाल, राजाभाऊ आवसक, राजेश लाहोटी, प्रकाश कलंत्री ,संध्या खरे, किसन हसे यांच्यासह अनेकांनी सूचना मांडले. यावेळी सर्व संगमनेरकर एकवटले होते.



