Naxalism : नगर : देशातील नक्षलवाद्यांच्या (Naxalism) युद्धात आजपर्यंत देशाचे खूप मोठ्याप्रमाणात वेळ व पैसा खर्च झाला आहे. तब्बल ४१ लाख करोड रुपये आजपर्यंत बरबाद झाले असून तब्बल १५ हजार सैनिक मारले गेले आहे. देश बाहेरील शत्रुपेक्षा देशातील शत्रूने आपले खूप नुकसान केले आहे. बस्टर भागात प्रत्येक चार किलोमीटरवर सीआरपीएफची छावणी आहे. तेथे ५० किमीचा रस्ता बनवण्यासाठी ६ वर्ष लागले त्यावेळी काम चालू असताना ३० ते ४० जवान शहीद झाले आहेत. अस खतरनाक हा परिसर आहे. २००५ सालापासून देशातील व छत्तिसगढच्या सरकारच्या सहकार्याने त्यांच्या कारवाया वाढल्या. त्यावेळीचे सरकार (Government) राजकीय नुकसान होऊ न देता देशाचे नुकसान करत गप्प बसायचे. पण देशातील वर्तमान सरकार साम, दाम, दंड, भेद या नीतीवर काम करत नक्षलवाद संपवण्याचे यशस्वी काम करत आहे. त्यामुळे नक्षलवादी स्वतःहून परिवर्तीत होत आहेत. युवक बंदुका फेकून कामधंद्याला लागले आहेत. स्थानिकांनीही सहकार्य कमी केले आहे. हे वर्तमान सरकारचे मोठे यश आहे, असे प्रतिपादन बस्तर द नक्सल स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक व नक्षली जीवन जगलेले अमरनाथ झा (Amarnath Jha) यांनी केले.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह ११ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
अमरनाथ झा यांची नक्षलवाद या विषयावर मुलाखत
विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेच्या तृतीय दिनी बस्तर द नक्सल स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक अमरनाथ झा यांची वास्तव नक्षलवादाचे या विषयावर प्रसिद्ध नाट्यकर्मी दीपक करंजीकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, क्रेडाईचे अध्यक्ष अगरवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी उपस्थित होते. तसेच भारत भारतीच्या राष्ट्रीय सचिव साधना राव, प्रदेश सचिव डॉ.धर्मेंद्र राजवद आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी नक्षलवाद या महत्वच्या विषयावर अमरनाथ झा व दीपक करंजीकर यांनी अत्यंत उद्बोधक चर्चा करत नवी व रंगतदार सत्य माहिती उपस्थितांना दिली. झा यांनी द बस्टर स्टोरीचा निर्मितीचा पट यावेळी उलगडला.
अवश्य वाचा : पर्यावरण रक्षणासाठी विघटनशील प्लास्टिक हेच भविष्य : मुख्यमंत्री
यावेळी अमरनाथ झा पुढे म्हणाले, (Naxalism)
देशातील सर्व डावे पक्षांचा एकाच उद्देश आहे, तो म्हणजे पूर्ण देशात लोकशाहीच्या जागी कम्युनिझम पसरवणे. नक्षली विचाराच्या माओवाद्यांनी व कम्युनिस्टांनी गोड व प्रेमळ भाषेत गरिबांच्या न्याय व हिताच्या गोष्टी करून संवेदनशील नागरिकांना आपल्याशी जोडून घेतात. माझ्या बरोबरही हेच झाले. मी नाटकात काम करत असल्याने छोटे नाटक करण्यासाठी त्यांनी मला बस्टर भागात नेले. त्यांच्या बरोबरच्या क्रांतीच्या कामाने मी प्रभावित होऊन स्वतःला भगतसिंग समजायला लागलो होतो. पण त्यांचे काम गरिबांच्या हितासाठी नसल्याचा विरोधाभास मला दिसला. गावातील अशिक्षित, गरजू शेतकरी यांच्या हातात ते बंदुका देतात. असे त्यांचे काम खूप खतरनाक होते. त्यामुळे तेथून हळूहळू बाहेर पडत गेलो. ते दिवस दिवास्वप्ना सारखे होते. या नक्षलींना सहकार्य करणारी मोठी ताकद आजही आहे. त्यांच्या त जनजागृती करणे आवश्यक आहे. मी काहींना परिवर्तीत केले आहे.
बस्टरवर जेव्हा चित्रपट काढण्यचे सुचले तेव्हा कहाणीसाठी पुन्हा बस्टर मध्ये जायचे ठरवले. त्यावेळी ज्यांच्या पतीचे ३५ तुकडे करून मारले अशा काही महिलांना भेटलो. त्यांची वेदनादायी घडलेली घटना ऐकतानाच ठरवले या महिलांची सत्यता व व्यथा द बस्टर स्टोरी मध्ये मांडण्याचे ठरवले.
यावेळी दीपक करंजीकर यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारत अमरनाथ झा यांना बोलते केले. ते म्हणाले, ज्यांनी प्रत्यक्षात नक्षली जीवन जागून त्या चाक्रव्हीवातून सुरक्षितपणे बाहेर येत तेथील सत्य परिस्थिती चित्रपटातून मांडण्याचे धाडस करणारे अमरनाथ झा हे असाधारण आहेत. सर्व विरोधकांवर मात करून त्यांनी सत्यता सर्वांसमोर ठेवली. आज ते देशहितासाठी काम करत आहेत. प्रारंभी विचार भारतीचे सदस्य डॉ.निळकंठ ठाकरे यांनी वक्त्यांचा व पाहुण्यांचा परिचय दिला. सुनील नागोरी यांनी आभार मानले.