वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार : संपत बारस्कर
NCP : अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरामध्ये वीजपुरवठा (Electricity) वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्थ विद्युत भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयातील वीजपुरवठा (Electricity Supply) बंद करून मेणबत्ती पेटवून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. पुढील आठ दिवसांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर (Sampat Barskar) यांनी दिला.
अवश्य वाचा : संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे : डॉ. पंकज आशिया
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी माजी नगरसेवक कुमार सिंह वाकळे, प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, मंगेश खताळ, संजय सपकाळ, दीपक खेडकर, सारंग पंधाडे, जॉय लोखंडे, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, आरती उफाडे, स्वप्नील ढवन, महेश गलांडे, गिरीश जगताप, राहुल कातोरे, अंकुश बोरुडे, संकेत कराड, अमोल जाधव, भगवान काटे, अभिषेक बोरुडे, परेश पुरोहित, दिनेश लंगोटे, दीपक लिपाने, संकेत झोडगे, सुरेश आडसूळ, अमित खामकर, अशोक चोभे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; चंद्रशेखर बावनकुळे
फोन लावल्यानंतर नागरिकांना मुजोर पद्धतीने उत्तरे (NCP)
अहिल्यानगर शहरामध्ये ग्राहकांकडून दंडेलशाही पद्धतीने वसुली केली जाते. मात्र त्यांना व्यवस्थित वीज पुरवठा केला जात नाही. मुळा धरण येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधिकारी वर्ग एसी लावून थंड वातावरणात बसतात, मात्र नागरिक अक्षरशा गर्मीमध्ये आपली रात्र काढत असतात. नागरिकांनी फोन लावल्यानंतर विद्युत विभागाच्या वतीने कधीही फोन उचलला जात नाही. नागरिकांना मुजोर पद्धतीने उत्तरे दिली जातात. पावसाळ्यापूर्वीच दुरुस्तीचे व झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेणे गरजेचे होते मात्र कुठल्याही उपयोजना न केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची भावना संपत बारस्कर यांनी व्यक्त केल्या.
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक यांची अतोनात हाल होत आहे. पावसाचे थेंब सुरू होण्यापूर्वीच वीज गुल होत असते. आठ दिवसांमध्ये वीजपुरवठा नियमित पणे सुरळीत न झाल्यास अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सुरेश बनसोडे यांनी दिला.
येत्या ८ दिवसांमध्ये सर्व वीज वाहिन्यांच्या देखभालीची कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत होणार नाही. रोहित्राचे डीपी बॉक्स व त्याचे दरवाजे गरजेच्या ठिकाणी त्वरीत बदली करण्यात येतील. रस्त्यामधील असलेले विद्युत पोल महानगरपालिकेच्या संमन्वयाने शिफ्ट करण्यात येतील. महावितरण कर्मचा-यांनी तोडलेल्या झाडाच्या फांद्या त्वरीत उचलण्यात येतील, वाकलेले वीज पोल सरळ करण्यात येतील. अतिभारीत असलेले वीज रोहित्राचे ठिकाणी उच्च क्षमतेचे रोहित्र बदलण्यात येतील. तसेच महावितरणच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी भ्रमणध्वनी स्विकारला नाही तर संबंधीतांवर कंपनीच्या नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता श्री. पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले.