News School Rules:राज्यातील सर्व शाळांना आता नवीन नियम;’या’ दिवसापासून नियम लागू 

0
News School Rules:राज्यातील सर्व शाळांना आता नवीन नियम;'या' दिवसापासून नियम लागू 
News School Rules:राज्यातील सर्व शाळांना आता नवीन नियम;'या' दिवसापासून नियम लागू 

New School Rules : बदलापूरच्या (Badlapur) शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले. या प्रकरणामुळे राज्य शासन खडबडून जागे झाले आहे. आता राज्य शासनाने राज्यातील सर्वच माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना नवीन नियम (New Rules) अनिवार्य केले आहेत. यात शाळांना राज्याची मान्यता,नवीन वर्गांना मान्यता,अतिरिक्त विभाग, सर्व मंडळांना शाळा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, राज्य अनुदानासाठी मान्यता,अध्यापन माध्यमांमध्ये बदल आदींसाठी हे नियम बंधनकारक केले आहेत. हे नवीन नियम २४ सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेत. 

नक्की वाचा : मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज  

नवीन नियम काय ? (News School Rules)

नवीन नियमानुसार शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, तक्रारपेटी बसविणे, दर आठवड्याला तक्रारपेटी उघडणे, विद्यार्थी दक्षता समिती, प्रत्येक कर्मचाऱ्याचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे, शिशुवर्ग, प्राथमिक, माध्यमिक व नववीपर्यंत विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून नियुक्ती, सखी-सावित्री समितीच्या नवीन बैठका, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेणे, विद्यार्थ्यांसाठी शाळेची स्वत:ची वाहतूक व्यवस्था, वाहनांना जीपीएस नेटवर्क व पॅनिक बटण लावणे, खासगी बसमध्ये महिला सहाय्यक ठेवणे, शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित घेणे, शाळांकडे आधारकार्डवर आधारित वर्गनिहाय यादी अनिवर्य, स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत,असे सरकारने शाळांना बजावले आहे, तसेच शाळांनी चालक व त्यांच्या सहाय्यकांमध्ये जनजागृती करावी, असं देखील या नवीन नियमात सांगण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here