Nilesh Lanke : डॉ. आंबेडकर आयुष रुग्णालय नामकरणाबाबत केंद्र सरकार अनुकूल; खासदार लंके यांचा पुढाकार

Nilesh Lanke : डॉ. आंबेडकर आयुष रुग्णालय नामकरणाबाबत केंद्र सरकार अनुकूल; खासदार लंके यांचा पुढाकार

0
Nilesh Lanke : डॉ. आंबेडकर आयुष रुग्णालय नामकरणाबाबत केंद्र सरकार अनुकूल; खासदार लंके यांचा पुढाकार
Nilesh Lanke : डॉ. आंबेडकर आयुष रुग्णालय नामकरणाबाबत केंद्र सरकार अनुकूल; खासदार लंके यांचा पुढाकार

कार्यवाहीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग

Nilesh Lanke : अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील (Ahilyanagar Lok Sabha Constituency) केंद्र प्रायोजित आयुष रुग्णालयास (Ayush Hospital) ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष रुग्णालय’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लंके यांच्या प्रस्तावास मंत्री प्रतापराव जाधव यांनी अनुकूलता दर्शवित कार्यवाहीसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग केला आहे.

अवश्य वाचा : राहाता तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान ; विखे यांच्याकडून पाहणी

नामकरणामागील सामाजिक भूमिका स्पष्ट केली

खासदार लंके यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी आयुष मंत्रालयाला सविस्तर पत्र पाठवून या नामकरणामागील सामाजिक व संविधानिक भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामीण भागातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांसाठी संबंधित आयुष रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समानता व सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन म्हणून या रुग्णालयास त्यांचे नाव देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद (Nilesh Lanke)

खासदार लंके यांच्या पत्रास आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी पाठविलेल्या उत्तरात या प्रस्तावाची दखल घेतली असून, संबंधित विषय महाराष्ट्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मंत्री जाधव यांनी स्पष्ट केले की संबंधित रुग्णालय राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत ‘५० खाटांचे एकात्मिक आयुष रुग्णालय’ म्हणून मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नावात राष्ट्रीय आयुष अभियानाचा संदर्भ असणे आवश्यक आहे. तसेच केंद्र प्रायोजित योजना असली तरी नामकरणाचा अंतिम अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर प्रस्ताव दिनांक १६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, आता या नामकरणाबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. या नामकरणामुळे सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळकटी मिळेल, तसेच वंचित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रस्तावास स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच राज्य सरकार यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.