OBC : नगर : राजकारणात नितीश कुमार (Nitish Kumar) व चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचा आधार मोदी (Narendra Modi) सरकारने घेतला आहे. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात हे दोघेही मोदी सरकार पाडतील, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी (OBC) विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव (Ajay Singh Yadav) यांनी केला.
नक्की वाचा: ‘छगन भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार’-मनोज जरांगे
मोदी नव्याने निवडणुका देशावर लादतील
नगरमध्ये पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. मात्र, मोदी तसे होऊ न देता नव्याने निवडणुका देशावर लादतील, असा दावाही कॅप्टन यादव यांनी केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा पॅरेडाईज सभागृहात झाला. यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ आदी उपस्थित हाेते.
अवश्य वाचा: महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाचा शिक्कामाेर्तब : मंत्री विखे पाटील
मोदी स्वतःला देवता मानतात (OBC)
केंद्रातील मोदी सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न इंडिया आघाडी करीत नाही. मात्र, या सरकारमधील नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू हे दोघे आगामी काळात सरकार पाडतील, असा दावा करून कॅप्टन यादव यांनी केला. यामुळेच केंद्राच्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, झारखंड व हरियाणाला पैसे न देता केवळ नितीश कुमार व चंद्राबाबूला पैसे दिले आहेत. शिवाय मोदी स्वतःला देव मानतात. अहंकार त्यांच्यात आहे, चारसाे पारचा नारा संविधान बदलासाठीच दिला होता. त्यामुळे येत्या दोन वर्षात हे सरकार स्वतःच्याच वजनाने पडेल, असा दावाही यादव यांनी केला.