Onion Farmers : केंद्र सरकारने कांदा उत्पादक (Onion farmer) शेतकऱ्यांबाबत (Farmers) घेतलेल्या निर्णयाचा फटका पुन्हा एकदा उत्पादकांना बसणार असल्याची चिन्ह दिसत आहे. निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत कांदा निर्यातदारांना मिळणारी १.९ टक्के परताव्याची सवलत सरकारने बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांद्याची मागणी कमी होण्याची शक्यताही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्यानं त्याचा बाजार भाव कोसळत आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नक्की वाचा : ‘दत्तक घेतलेल्या नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं’;संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
….अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाणार (Onion Farmers)
नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने निर्यात प्रोत्साहन अनुदान रद्दचा निर्णय मागे घ्यावा, तसेच १०% निर्यात प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार,असा इशारा ही दिघोळे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा प्रश्न अधिक चिघळणार की त्यावर सरकार कडून काही तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी! शशांक अन् लता हगवणेच्या अडचणी वाढल्या;आणखी एक गुन्हा दाखल