नगर : राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. मात्र मी अशा आव्हानांचा सामना धैर्यपूर्वक करतो. सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही. सत्ता (Power) हे सेवेचे माध्यम आहे,असं आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी केले. ते बुधवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेस द मीट’ (Press The Meet) कार्यक्रमात बोलत होते.
नक्की वाचा : आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर,भारत-पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारीला
‘मी मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका’ (Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो. तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या.हा मंत्रीही नव्हता,नवखा आहे, मग कारभार कसा करणार,असा प्रश्न अनेकांना पडला होता.पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं,सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की,आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले. राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपण ऊर्जा विभागाचा २५ वर्षांचा रोडमॅप तयार केला. पुढच्या दोन-तीन वर्षात अशी परिस्थिती येईल की, आपण उद्योगासहित सर्वप्रकारच्या वीजेचे दर कमी करु शकतो,अशी व्यवस्था आपण उभारली आहे, असे महत्त्वाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अवश्य वाचा : ‘ट्राय’चा मोठा निर्णय!आता कॉलिंग आणि एसएमएससाठी मिळणार वेगळे प्लॅन
‘विदर्भाचा कायापालट होणार’ (Devendra Fadnavis)
ते पुढे म्हणाले की,आपण राज्यभरात सहा नदीजोड प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत.यामुळे विदर्भातील १० लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे विदर्भाचा कायापालट होणार आहे. हे प्रकल्प अनेक पिढ्यांवर परिणाम करणारे आहेत. गडचिरोली जिल्हा नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून उदयाला आला आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभी राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.