Radhakrishna Vikhe Patil : गारपीट, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : गारपीट, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : गारपीट, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेती पीक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करा, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनास (Administration) दिल्या आहेत.

हे देखील वाचा : जायकवाडीला सोडलेल्या पाण्याला स्थगिती द्या; संगमनेरात काँग्रेसचे आंदोलन

जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नूकसानीची माहीती पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने एकत्रितपणे करण्याच्या सूचना आपण प्रशासनास दिल्या आहे. आणखीनही काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. ग्रामीण भागात काही नागरीकांच्या घरांचे किंवा जनावारांच्या गोठ्याचे नुकसान झाले असल्यास तातडीच्या उपाययोजना तसेच मदत करण्याबाबत प्रशासनास सांगितले आहे. या नैसर्गिक संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नक्की वाचा : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा ‘वन नेशन-वन क्यू आर कोड’

गारपीट आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा समोर येण्यास अवधी लागेल. परंतु महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या प्राथमिक माहीतीनूसार पारनेर तालुक्यात शंभर जनावरे जखमी आणि चार घरांची पडझड झाली आहे. संगमनेर तालुक्यात ४ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. दहा घरांची पडझड झाली आहे. राहुरी तालुक्यात १२ कोकरू ६ मेंढ्या व १ शेळी मयत झाली. ७ घरांची पडझड झाली आहे. अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यातही घरांची पडझड व जनावरे दगावल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकऱ्यांसमवेत पाहणी दौरा करणार आहे. सद्य परिस्थितीत स्थानिक अधिकाऱ्यांनी नूकसान झालेल्या ठिकाणाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here