Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल

Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल

0
Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल
Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल

Radhakrishna Vikhe Patil : नगर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) झालेल्‍या चुका पुन्‍हा होऊ देऊ नका, स्‍वत:च्या गावापासून काम सुरू करा. येणाऱ्या काळात विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला तुम्‍हाला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्‍याचे काम करायचे आहे. विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहिलेले नाही. महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या (State Govt) योजनांचे मोठे काम आपल्‍याकडे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्‍येक गावापर्यंत योजना पोहोचविण्‍याचे काम संघटीतपणे करा, विधानसभा (Assembly) निवडणूकीत महायुतीलाच यश मिळेल, असा विश्‍वास महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्‍यक्‍त केला.

Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल
👇 बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://wp.me/pf0BKS-54p

*I ❤नगर | खासदार निलेश लंके यांची सविस्तर मुलाखत....*
👇 बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/gaV5Dx8iF-0?si=QKAJJp-CpgGVSPC6

*बहीण-भावाचे प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी खास ‘राखी पाकीट’ याेजना; टपाल खात्याकडून विशेष सुविधा उपलब्ध*
👇 बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://wp.me/pf0BKS-54e

*२० दिवसांनंतर पंढरीच्या विठूरायाला मिळणार आराम!*   
👇 बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://wp.me/pf0BKS-540

-----------------------------------
📣 *अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स इंस्टाग्रामवर मिळविण्यासाठी क्लिक करा*
📲 https://www.instagram.com/ilovenagar.news/
-----------------------------------
Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल

पदाधिकारी, बुथप्रमुख यांची बैठक (Radhakrishna Vikhe Patil)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे जिल्‍ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्‍तिकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरी येथे झाली. या बैठकीला प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्‍हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, वैभव पिचड, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीप भालसिंग, शहर जिल्‍हाध्‍यक्ष अभय आगरकर, महिला जिल्‍हाध्‍यक्षा अर्चना थोरात, कांचन मांढरे, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, नानासाहेब पवार, नितीन दिनकर, अरुण मुंढे, सत्‍यजीत कदम, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदी उपस्थित हाेते. 

Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल
Radhakrishna Vikhe Patil : महाविकास आघाडीचा ढाेंगीपणा उघड करण्याची हीच संधी; मंत्री राधाकृष्ण विखेंचा हल्लाबाेल

मंत्री विखे पाटील म्‍हणाले (Radhakrishna Vikhe Patil)

”लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला असला तरी, देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. याचा सर्वांना अभिमान आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेल्‍या नकारात्‍मक प्रवाराला आपण उत्तर देण्‍यास कमी पडलो. ही चूक पुन्‍हा होऊ द्यायची नसेल तर, केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजना प्रभावीपणे प्रत्‍येक गावामध्‍ये पोहोचवा. सोशल मीडियावर कोण काय चर्चा करते, यापेक्षा या योजनांचीच माहिती लोकांपर्यंत पोहोचविली तर, विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला ते प्रभावी उत्तर होऊ शकेल,” असे मंत्री विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दहा वर्षांच्‍या कार्यकाळात या राज्‍यासाठी विविध प्रकारची मदत झाली. सहकारी साखर कारखान्‍यांचा आयकराचा बोजा मोदी सरकारमुळे कमी झाला. इथेनॉल निर्मितीला प्रोत्‍साहनही केंद्र सरकारमुळे मिळाले. मात्र, दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री राहूनही या राज्‍याच्‍या हिताचे एकही काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना करता आले नाही. नुकत्‍याच सादर झालेल्‍या केंद्र सरकारच्‍या अर्थसंकल्‍पातही युवक, महिला, आदिवासी यांच्‍याकरिता मोठ्या निधीची तरतूद करुन, सर्वच समाज घटकांना न्‍याय देण्‍याची भूमिका घेतली गेली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍यातील महायुती सरकारनेही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेपासून ते शेतकऱ्यांना मोफत वीज देण्‍यापर्यंत योजना जाहीर केल्‍या आहेत. कौशल्‍य विकासातून युवकांनाही रोजगाराच्‍या संधी निर्माण करुन दिल्‍या आहेत. महायुती सरकारमुळेच जिल्‍ह्याच्‍या विकासाला गती मिळत असून, तीन औद्योगिक वसाहती सुरु होण्‍याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आपले हित कशात आहे, हे मतदारांना समजावून सांगण्‍याची जबाबदारी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची आहे. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी असल्‍याची त्‍यांनी सांगितले.

  डॉ. सुजय विखे पाटील म्‍हणाले, ”विधानसभा निवडणुका जिंकायच्‍या असतील तर, सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार आणण्‍यासाठी प्रत्‍येक आमदार आपला महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ अपप्रचार झाला. मागील पाच वर्षांत केलेला विकास अवघ्‍या दोन महिन्‍यांत कुठे वाहून गेला हेही समजले नाही. सत्ता आली तरच कार्यकर्ते जिवंत राहतील, यासाठी आपला लोकप्रतिनिधी महत्त्वाचा आहे. महायुती सरकार आले तरच सामान्‍य माणसाला न्‍याय मिळेल, विकासाची कामे मार्गी लागतील, कोण काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्‍टीने महत्त्व नाही. मात्र, कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झालीच, तर जशासतसे उत्तर देण्‍यास मागेपुढे पाहू नका. तुमच्‍या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे,” असे त्‍यांनी कार्यकर्त्‍यांना आश्‍वासित केले.

महामंत्री विजय चौधरी यांनी महायुती सरकारमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र, केवळ विरोधी बाजू पुढे आणून सरकारला बदनाम करणारे चार वेळा मुख्‍यमंत्री होते. त्‍यांना मराठा समाजाला न्‍याय देता आला नाही. लोकसभा निवडणुकीत धार्मिक तेढ निर्माण करुन, महाविकास आघाडीने विजय मिळविला असला तरी, विधानसभा निवडणुकीत नियोजनबद्ध पद्धतीने आपल्‍याला सामोरे जावे लागणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कारगील विजय दिनानिमित्ताने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्‍यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here