Radhakrishna Vikhe Patil : प्रशासन व वारकऱ्यांच्या समन्वयाने आषाढी वारी दिंड्यांचे उत्तम नियोजन : मंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : प्रशासन व वारकऱ्यांच्या समन्वयाने आषाढी वारी दिंड्यांचे उत्तम नियोजन : मंत्री विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : प्रशासन व वारकऱ्यांच्या समन्वयाने आषाढी वारी दिंड्यांचे उत्तम नियोजन : मंत्री विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : प्रशासन व वारकऱ्यांच्या समन्वयाने आषाढी वारी दिंड्यांचे उत्तम नियोजन : मंत्री विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : नगर : जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे (Dindi Sohala) प्रमुख, वारकरी (Varkari) व प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकमेकांमधील समन्वय व सहकार्याने पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली. तसेच जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्ग सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरूस्त कराव्यात‌. दिंडी मार्गावर मुलभूत सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत

आषाढी वारी नियोजन बैठक आयोजित

जिल्हाधिकारी कार्यालयात आषाढी वारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अशोक सावंत महाराज आदी उपस्थित होते.संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत. दिंड्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात यावे. यावर्षी पालखीच्या सुरूवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्यावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे‌.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक (Radhakrishna Vikhe Patil)

जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.‌ प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात यावी. विखे पाटील म्हणाले, ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व शौचालयाची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल. वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याबैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.