Rahul Gandhi : नगर : मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेबाबत सादरीकरण करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (7 ऑगस्ट) निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपवर (BJP) मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. राहुल म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत.
अवश्य वाचा : आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
स्क्रीनवर मतदार यादी दाखवताना राहुल गांधी म्हणाले की,
महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंकांना पुष्टी मिळाली की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने, निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे अशी आमची खात्री पटल्याचे ते म्हणाले. राहुल म्हणाले की, कर्नाटकात वेगवेगळ्या बूथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आहे. अनेक ठिकाणी यादीत लोकांचे फोटो नाहीत. त्याच वेळी, अनेक ठिकाणी बनावट पत्ते लिहिले गेले आहेत.
नक्की वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न
महाराष्ट्रात 40 लाख नवे मतदार आले कुठून? (Rahul Gandhi)
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 40 लाख बनावट नवे मतदार कुठून आले: महाराष्ट्रात काही महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत जोडण्यात आली, जी खूपच चिंताजनक आहे. 40 लाख मतदार गूढ आहेत. पाच महिन्यांत येथे अनेक मतदार जोडले गेले. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे.