Rain Alert :राज्यात ‘या’ दिवशी पडणार मुसळधार पाऊस;मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा  

0
Rain Alert :राज्यात 'या' दिवशी पडणार मुसळधार पाऊस;मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा  
Rain Alert :राज्यात 'या' दिवशी पडणार मुसळधार पाऊस;मुंबईसह ठाणे व रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा  

Rain Alert : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काल (ता.११) जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. त्यातच आगामी काही दिवसांत मोसमी पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना आजपासून सतर्कतेचा इशारा (Warning) दिला आहे. १४ आणि १५ जून रोजी या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्की वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर  

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार (Rain Alert)

तामिळनाडू आणि दक्षिण महाराष्ट्रात आता द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर उत्तर ओडिशा आणि जवळच्या भागात देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती दक्षिण महाराष्ट्राकडे सरकत आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. या कालावधीत प्रामुख्याने दक्षिण कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १२ ते १७ जून या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजपासून सतर्कतेचा इशारा म्हणजे यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

अवश्य वाचा : ‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा  

मुंबईत पावसाचा जोर वाढणार  (Rain Alert)

मुंबई, तसेच ठाणे परिसरात शनिवारी (ता.१४) आणि रविवारी (ता.१५) पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे,असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात यंदा नैऋत्य मोसमी वारे लवकर दाखल झाले असले तरी मागील दोन आठवड्यांपासून त्यांचा वेग मंदावला आहे. अहिल्यानगर, मुंबई, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असून शनिवारपासून मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मोसमी वारे वाटचाल करण्याची शक्यता आहे.