rain alert : राज्यात मान्सूनचा मागील १२ तासांपासून मान्सूनचा जोर पुन्हा वाढल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी म्हणजे १९ जून ते २२ जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांचा परिणाम होऊन आणि सक्रिय मान्सूनमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये १९ जूनला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही काही भागांत जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अवश्य वाचा : सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका ; राज ठाकरेंच मुख्याध्यापकांना आवाहन
मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी (Rain Alert)
मुंबई व पुण्यात आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत आज ७० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Rain Alert)
घाटमाथ्यावर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये १९ जूनला मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. २० ते २२ जून दरम्यान या भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. लातूरमध्ये २० जूनला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः नदीकिनारी व डोंगराळ भागातील रहिवासी व पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.