Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार!; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

0
Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र
Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

Raj Thackeray : नगर : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत (Mumbai) होणाऱ्या विजयी मेळाव्याचे ठिकाण जवळपास निश्चित झाले आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्कात (Shivaji Park) हा ऐतिहासिक मेळावा होण्याची शक्यता आहे. येत्या 5 जुलै रोजी हा विजयी मेळावा होणार आहे.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

मराठी भाषाप्रेमी येत्या 5 जुलै रोजी जमणार

राज्य सरकारच्या हिंदी सक्तीचा घेतलेला निर्णय रद्द करावा म्हणून ठाकरे गट आणि मनसेने संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. पण त्याआधीच सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करून या मोर्चामधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण आमचं उद्दीष्ट साध्य झालं असलं तरी शिवसैनिक तसेच मराठी भाषाप्रेमी येत्या 5 जुलै रोजी जमणार आहेत. हा हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा नसेल पण हा विजयी वेळावा असेल असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. तसेच त्यांनी यात मनसेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही बंधू शिवाजी पार्कवर एकत्र येत मुंबईत नवा एल्गार करणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर मुंबई पालिका निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकारणाचा मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर होणाऱ्या या विजयी मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र
Raj Thackeray : मुंबईत विजयी मेळाव्याचा एल्गार! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

राजकारणातील बदल पाहणे ठरणार औत्सुक्याचे (Raj Thackeray)

विशेष म्हणजे याच ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले भाषण केले होते. शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी याच जागेवरून संपूर्ण शिवसैनिक तसेच महाराष्ट्राला संबोधित केले होते. त्यांच्या या भाषणानंतर शिवसेनेचा वटवृक्ष विस्तारत गेला होता. आता याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन भाषण करणार आहेत. त्यामुळे त्यांचे एकत्र येणे राजकारणात कोणते बदल घडविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.