नगर : राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या (Hindi Language) सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरु आहे ? याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू, असे पत्र राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवणार असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
‘जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका’ (Raj Thackeray)
राज ठाकरे यावेळी म्हणाले की, “आज मी तिसरं पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवणार आहे. तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरु आहे ? याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका, असं ते म्हणालेत.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेवर चित्रपट येणार; गौतमी पाटील व अण्णा नाईक साकारणार महत्वाची भूमिका
‘आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू’ (Raj Thackeray)
“सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू. आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का ? गुजरात सरकारचा जीआर आहे. पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू, भगिनी, शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे, असं राज ठाकरे म्हणाले.