Raj Thackeray:’शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे 

शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये,असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

0
Raj Thackeray:'शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये'- राज ठाकरे 
Raj Thackeray:'शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये'- राज ठाकरे 

Raj Thackeray : ‘शरद पवार (Sharad Pawar) यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’,असे खोचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. राज ठाकरे हे सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मराठा (Maratha Reservation) णि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत भाष्य केले.

नक्की वाचा : मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द  

‘महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही,याची काळजी शरद पवारांनी घ्यावी’ (Raj Thackeray)

शरद पवारांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली होती. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

भाजपच्या नेत्यांनी याआधी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे आरोप केले होते. आता राज ठाकरे यांनीही याच भूमिकेची री ओढली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, ही चर्चा सुरु असतानाच राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीयवादासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांनाच जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता यावर शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अवश्य वाचा : अमिताभ बच्चन यांनी शेअर केले शाळेतील’ते’जुने फोटो,एकदा पहाच!

जातीपातीच्या राजकारणाने महाराष्ट्राची दुर्दशा’ – राज ठाकरे (Raj Thackeray)

मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे. लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वादामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती, हे सगळं आता शाळा-कॉलेजपर्यंत गेलं आहे. हे चित्र भीषण आहे. असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे केवळ मतांचं राजकारण आहे
ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीच्यावेळी दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here