RCB : अहिल्यानगर : एक काळी आयपीएल (IPL) मध्ये बदली खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात सामील झालेल्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) संघाचा १ ८ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील RCB संघाचे व क्रिकेट चाहत्यांच्या लाडक्या विराट कोहलीचेही (Virat Kohli) स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या रजत पाटीदारचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नक्की वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार?
बदली खेळाडू म्हणून आला होता संघात
२०२२ साली रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एक बदली खेळाडू म्हणून आला होता. कोणाला वाटलं होतं, की हा शांत स्वभावाचा फलंदाज एक दिवस विराट कोहलीचं १८ वर्षांचं स्वप्न पूर्ण करेल? पण कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएलच्या इतिहासातील पहिली ट्रॉफी जिंकली आहे. २०२२ च्या आयपीएल हंगामात RCB चा खेळाडू लवनीथ सिसोदिया जखमी झाला, आणि त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात घेतलं गेलं. सुरुवातीला पाटीदारला वाटलं की त्याला खेळायला संधी मिळणार नाही, पण नशिबाने त्याला संधी मिळाली. २५ मे २०२२ रोजी, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या Eliminator सामन्यात पाटीदारने ११२ धावांची नाबाद खेळी केली. ही आयपीएल प्लेऑफमध्ये कोणत्याही नवख्या खेळाडूने केलेली पहिली शतकी खेळी होती. या कामगिरीमुळे तो चर्चेत आला आणि RCB ने त्याला पुढील हंगामासाठी कायम ठेवला.
अवश्य वाचा : ‘गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल’;संजय राऊतांची टीका
९० हजार प्रेक्षकांसमोर उचलली ट्रॉफी (RCB)
पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो महत्त्वाच्या क्षणी शांत राहिला आणि गोलंदाजीत चांगला बदल करत विरोधी संघावर दबाव आणला. जेव्हा आरसीबीने १९० धावा केल्या तेव्हा बहुतेक क्रिकेट पंडितांचे मत होते की पंजाब संघाकडे १९१ धावांचे लक्ष्य सहज गाठण्यासाठी मजबूत फलंदाजी आहे. पण, असे घडले नाही आणि रजत पाटीदारच्या हुशार कर्णधारपदामुळे आरसीबीला ६ धावांनी सामना जिंकण्यास मदत झाली.