Rohini Khadse : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नक्की वाचा : ‘सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ’;देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात बाळाला जन्म देण्याची वेळ (Rohini Khadse)
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे, अशा बातम्या काल परवापासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की, जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. मात्र आपल्या भारतात ते घडले आहे. तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : जूनमध्ये तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद
पुढे त्या म्हणाल्या की,आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे,त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे. प्रत्येकासाठी ही लाजीरवाणी बाब आहे. पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे, ही शोकांतिका आहे, असं त्या म्हणाल्या.
रोहिणी खडसेंनी केली सोशल मिडियावर पोस्ट (Rohini Khadse)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टिमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत आहे. अजून किती दिवस माझ्या लाड़क्या बहिनीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेडसांड होत राहील असा प्रश्नही त्यांनी केला आहे.