Rohit Sharma century : राजकोटच्या मैदानावर रोहित शर्माने झळकावले शतक

राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा हिटमॅन कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज शतक ठोकलं. रोहित शर्माचं कसोटीतील हे ११ वे शतक आहे.

0
Rohit Sharma century
Rohit Sharma century

नगर : राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (India vs England Test) हिटमॅन कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma century) धडाकेबाज शतक ठोकलं. रोहित शर्माचं कसोटीतील हे ११ वे शतक आहे. १५७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह त्यांनी शतकाला गवसणी घातली. याआधीच्या दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला विशेष कामगिरी करता आली नव्हती. ती कसर रोहित शर्माने या कसोटीत भरुन काढली आहे.

नक्की वाचा : पुण्यानंतर आता ‘निर्भय बनाे सभेचे’ नगरमध्ये आयाेजन; निखिल वागळेंची तोफ धडाडणार

या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची अवस्था ३ बाद ३३ अशी होती. या परिस्थितीतून रोहित शर्माने रवींद्र जडेजाला सोबतीला घेत,आपल्या खेळीला आकार दिला.रोहित शर्माने सलामीचा फलंदाज म्हणून इंग्लंडविरुद्ध झळकावलेले हे तिसरं शतक आहे. भारताकडून यापूर्वी इंग्लंडविरुद्ध सलामीला येऊन केएल राहुल, मुरली विजय, विजय मर्चेंट यांनीही तीन-तीन शतकं झळकावली आहेत. सुनील गावस्कर यांच्या नावे सर्वाधिक चार शतकांचा समावेश आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात आघाडीची फळी फ्लॉप (Rohit Sharma century)

भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात भारताला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. मागील कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालला या सामन्यात फक्त १० धावाच करता आल्या. मार्क वूडने त्याला बाद करुन भारताला पहिला झटका दिला. यानंतर मागच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल मैदानात आला. मात्र त्याला या सामन्यात काहीच कमाल करता आलेली नाही. वूडनेच त्याला शून्यावर बाद केलं. मग फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्याने देखील भ्रमनिरास केला. रजत पाटीदारला हार्टलीने अवघ्या ५ धावांवर माघारी पाठवून भारताची अवस्था ३ बाद ३३ अशी केली.

अवश्य वाचा : कवी नामदेव ढसाळांचा झंझावत मोठ्या पडद्यावर येणार  

रवींद्र जडेजा आणि रोहित शर्माने डाव सावरला (Rohit Sharma century)

टीम इंडिया संकटात असताना, रोहित शर्माने रवींद्र जडेजाच्या साथीने डाव सावरला. जडेजा पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला.त्याने  एक-दोन धावा काढत रोहित शर्माला उत्तम साथ दिली. या जोडीने केलेल्या संयमी खेळीमुळे भारताने ५९ षटकात २०६ धावांचा टप्पा ओलांडला.

टीम इंडियाची प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here