Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर

Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर

0
Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर
Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर

Sampat Baraskar : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या (AMC) प्रभाग क्रमांक १ मधील विकासाची कामे झपाट्याने मार्गी लागत आहे. आम्ही कचरा घेऊन जाण्यासाठी चे नियोजन करू, मात्र रस्त्यावर कचरा टाकू नका. जेणेकरून आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका. असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर (Sampat Baraskar) यांनी केले.

Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर
Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर

अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ

अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, भैय्या चव्हाण, किसन कजबे, किसन नांगरे आदीसह नागरिक व महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर
Sampat Baraskar : नागरिकांनी आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका : संपत बारस्कर

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

संपत बारस्कर म्हणाले की, (Sampat Baraskar)

सातत्याने स्वच्छ,सुंदर,हरित वार्ड करण्यासाठी प्रयत्न केले असून, त्याला यश येताना दिसत आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा धरून वाटचाल केली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे हाती घेतली. त्यानुसार रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, स्वच्छता, ओपन स्पेस, सुशोभीकरण, वृक्षारोपण व संवर्धन कामे मार्गी लागली असल्यामुळेच प्रभाग क्रमांक १ हा विकास कामातून शहरात वेगळी ओळख निर्माण करेल, भिस्तबाग महालाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून, जिल्ह्यातील पर्यटकांचे मनोरंजनाचे केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही, स्वच्छता ही मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाचा विषय आहे. नागरिकांनी देखील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता ठेवावी. जेणेकरून मनुष्याचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल जरी मनपाची घंटागाडी दररोज येत नसली तरी दोन दिवस कचरा साठवून ठेवा व आमच्याशी संपर्क करा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी डॉ. सागर बोरुडे यांनी सांगितले की, समाजामध्ये वावरत असताना नागरिक सर्वात जास्त प्लास्टिक वस्तूचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या परिसरामध्ये सर्वत्र प्लॅस्टिक पसरलेले दिसते, त्यातून दुर्गंध पसरते. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी होत असते व नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो, यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवीचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत लो चळवळ उभी करावी, असे ते म्हणाले.

संपत बारस्कर यांनी सांगितले की, पूर्वी प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्ते नसल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी येत नव्हते. आता मात्र सर्वत्र रस्त्यांची कामे पूर्ण होताना दिसत आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. प्रभागामध्ये विकासाची कामे होत आहे. हे माझे मत आहे. याबाबत लोकांचे काय मत आहे हे लोकांनी मला सांगावे, महापालिकेचे सफाई कर्मचारी खऱ्या अर्थाने नगर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असल्याचे मत बारस्कर यांनी व्यक्त केले.