Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी

Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी

0
Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी

Sangram Jagtap : नगर : भारतामध्ये आजपर्यंत एकही मुस्लिमचे (Muslim) हिंदू धर्मात बळजबरीने धर्मांतर झालेले नाही. पण भारतासह भारताबाहेरील हिंदू आज धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत. त्यामुळे या धर्मांतर करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या व पाद्रींच्या कामाला प्रखर विरोध होण्यासाठी केवळ मोर्चे काढून उपयोग नाही. हिंदूचे धर्मांतर (Hindu Conversion) होणार नाही, यासाठी प्रत्येकाने जागरूकपणे काम करावे. राज्य सरकारने (State Government)केंद्र सरकारने (Central Government) तातडीने धर्मांतर विरोधात व लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधात चांगला कडक कायदा आणावा. जेणेकरून कोणताच नि:ष्पाप हिंदू धर्मांतरास बळी पडणार नाही, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केली.

अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी

धर्मांतर विरोधी कायदा राज्यात व देशात लागू झाला पाहिजे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून रविवारी (ता.२२) अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मार्केट यार्ड चौकात झालेल्या सभेत संग्राम जगताप बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, वर्षा डहाळे व आदिनाथ पालवे महाराज आदींसह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांनी पेटत्या मशाली हातात घेतल्या होत्या तर धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी करणारे फलकही हातात घेतले होते.

Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी
Sangram Jagtap : लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करा : आमदार संग्राम जगताप यांची मागणी

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

आमदार जगताप पुढे म्हणाले, (Sangram Jagtap)

सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या उच्चशिक्षित हिंदू भगिनीची सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक करून लग्नानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ केला गेला. पण ती भगिनी ठाम राहत धर्मांतर केले नाही. तर छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे बलिदान पत्करले. तिचे हे बलिदान कधी विसरता कामा नये. म्हणून देशात व राज्यात धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने हिंदू धर्मावर हल्ले होत आहेत. हे हल्ले थोपवण्यासाठी आपण धर्मासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद विरोधात व लोकसंख्या नियंत्रण कायदा ही तातडीने अमलात आला पाहिजे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर हे अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे सर्व हिंदू नागरिकांनी जागृत राहून या जिहादी व ख्रिश्चन पाद्रींना आपल्या भागातून हाकलून द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी व प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांनी बेकायदेशीरपणे उभा राहिलेल्या मशिदी व चर्च त्यांची शहानिशा करून तातडीने त्याच्यावर बुलडोझर फिरवला पाहिजे. अनेक जण जातीने ख्रिश्चन आहेत पण शासकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते कागदोपत्री एससी एसटी किंवा ओबीसी असल्याचे दाखवतात शासकीय लाभ व नौकरी करत आहेत. अशा फसवणूक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधातही बडतर्फची कारवाई झाली पाहिजे. यावेळी वर्षा डहाळे यांनी मनोगत व्यक्त करत परखडपणे विचार व्यक्त करत धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी केली. सभेचे सूत्रसंचालन दिनेश जोशी यांनी केले. तर आभार चंद्रकांत काळोखे यांनी मानले.