Sangram Jagtap : अध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना : संग्राम जगताप 

Sangram Jagtap : अध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना : संग्राम जगताप 

0
Sangram Jagtap : अध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना : संग्राम जगताप 
Sangram Jagtap : अध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना : संग्राम जगताप 

Sangram Jagtap : नगर :संत निवृत्तीनाथ महाराजांच्या (Sant Nivruttinath Maharaj) विचारांचा वारसा वारकऱ्यांच्या दिंडीच्या (Dindi) माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे जात आहे. आपल्या संस्कृतीचा आत्मा असलेली ही परंपरा प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचे कार्य वारकरी करत आहेत. भगव्या पताका हातात घेऊन हरिनामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पावन स्पर्शाने संपूर्ण परिसर नवचैतन्याने भारलेला आहे. सूर्य-चंद्र असेपर्यंत हा अध्यात्मिक वारसा अखंड सुरू राहावा, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगितले.

अवश्य वाचा : वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये कुठलीही कमतरता भासू देणार नाही – सभापती राम शिंदे

संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे स्वागत

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्यांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत असतात. या भक्तिभावाने आनंदीमय वातावरणात अहिल्यानगर जिल्ह्यातूनही विविध संतांच्या दिंड्या मार्गस्थ होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संत निवृत्तीनाथ महाराज समाधी पालखी पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. 

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

आमदार जगताप पुढे म्हणाले की, (Sangram Jagtap)

या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने मार्केट यार्ड येथे हमाल पंचायतच्या वतीने कै. शंकरराव घुले यांनी सुरू केलेली वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा आजही त्यांचे बंधू माजी सभापती अविनाश घुले यांनी श्रद्धेने पुढे चालवली आहे. वर्षभरासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणाऱ्या या दिंडी सोहळ्याच्या आयोजनामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतना एकत्रितपणे व्यक्त होत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले, असे त्यांनी सांगितले.