Sangram Jagtap : नगर : देशामध्ये इंदोर (Indore) हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. आपले शहर देखील स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करू यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या (Garbage Problem) निर्माण झाली होती. आता शहरात महापालिकेच्या माध्यमातून ८० घंटागाड्या धावणार आहेत. नागरिकांनी आपला कचरा घंटागाड्यांमध्येच टाकावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले आहे.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित
वाडिया पार्क येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने ८० घंटागाड्या कचरा संकलन कामाचा प्रारंभ हायजिन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, उपायुक्त संतोष टेगळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अनिल बोरुडे, दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किशोर डागवाले, मनोज कोतकर, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, माजी नगरसेवक संजय चोपडा, रेश्मा आठरे, लता शेळके, निखिल वारे, सचिन जाधव, शिवाजी चव्हाण, धनंजय जाधव, संभाजी पवार, बाळासाहेब पवार, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, रामदास आंधळे, अमोल गाडे, प्रा.माणिकराव विधाते, हनुमंत कातोरे, विजय गव्हाळे, सचिन शिंदे, अरविंद शिंदे, अजय चितळे, मनोज साठे, दत्ता मुदगल, युवराज शिंदे, विपुल शेटीया, ज्ञानदेव पांडुळे, दगडू पवार, संजय ढोणे, सुनील त्रिंबके, सतीश शिंदे, महेश लोंढे, महेश तवले, अभिजीत बोरुडे, जितू गंभीर, वैभव ढाकणे, वैभव वाघ, शंभू गिरवले, सुनील कोतकर, महेंद्र कांबळे, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, रणजीत सत्रे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, नितीन शेलार, प्रदीप परदेशी, सुरेश बनसोडे, अतुल जाधव, गोरख पडोळे, दीपक खेडकर, अमित खामकर, टिनू भंडारी, प्रशांत बेल्हेकर, सोनू घेबुड, सुजय मोहिते, अशोक साबळे आदीसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, (Sangram Jagtap)
शहरांमधील कचरा संकलन करण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट ही एजन्सी नव्याने नेमली आहे. ८० घंटागाड्या घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणार आहे. याचबरोबर घंटागाडी आपल्या घरी नाही आली तर हेल्पलाइनवर फोन करावा तातडीने घंटागाडी उपलब्ध होईल. देशामधील स्वच्छतेच्या स्पर्धेमध्ये ड वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये अहिल्यानगर महापालिकेचा देशात पाचवा क्रमांक आला आहे हाच क्रमांक एक पर्यंत घेऊन जायचं आहे तरी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीमध्येच टाकावा, असे आवाहन त्यांनी केले. मनोज कोतकर म्हणाले की गेल्या काही दिवसापासून शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती ती सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले असल्यामुळेच ८० घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. आता कचऱ्याचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



