Sangram Jagtap: हैद्राबादचं (Hyderabad) खुराट बोकड आणि छत्रपती संभाजीगरचं बोकड अहिल्यानगरमध्ये आले आणि काहीतरी बडबड करुन गेलं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Mla Sangram Jagtap) यांनी एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी, (Asaduddin Owaisi) माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर खोचक खोचक शब्दात टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानजनक पत्रके भिरकावल्या प्रकरणी काल (ता. १२) अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते.
नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
आमदार संग्राम जगताप म्हणाले की,एमआयएमची बोकडं त्या दिवशी अहिल्यानगर मध्ये आली होती. एक हैद्राबादचं खुराट बोकड आणि दुसरं बोकड छत्रपती संभाजीनगरवरुन आलं. ती बोकडं आली अन् काहीतरी बडबड करुन गेली. आता त्यांची भाषा बदलली आहे. याआधी पंधरा मिनिट के लिए पोलिस हटाव फिर देखेंगे क्या करते हे, असं ते म्हणायचे पण आता पंधरा नाही तू पाचच मिनिट सांग, या शब्दांत संग्राम जगताप यांनी एमआयएमच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
अवश्य वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
अहिल्यानगरमध्ये आलेल्या बोकडांनी फरीद खानचा निषेध केला का ? (Sangram Jagtap)
अहिल्यानगर मध्ये आलेल्या बोकडांनी फरीद खानचा निषेध केला का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अवमान करणारे पत्रके फेकणाऱ्या फरीद खानची काही दिवसांपूर्वी एका बौद्ध बांधवाशी बाचाबाची झाली. याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केलं. पोलिस प्रशासनाने तत्काळ या आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर समजलं की, हा सुद्धा डॉबरमॅन आहे. ह्या बोकडांची आता जिरली, या शब्दांत आमदार जगताप यांनी टीका केली आहे.
‘खरेदी अपनो से करो’ ही सुरुवात त्यांनीच केली… (Sangram Jagtap)
आपण बोललो की, दिवाळीत हिंदूंकडून खरेदी करणे. ईदच्यावेळी ह्या लोकांनी अशी पत्रके वाटली, त्याच्यावर लिहिलंय की, ईद की खरेदी अपनो से करे अपना खायेगा जकात निकलेगा. आपली जकात बंद झाली पण यांची अजून सुरु आहे. अनेक वर्षांपासून हे सुरु आहे. आपण जाऊ द्या म्हणायचो. जबाबदार लोकांना आम्ही भेटलो, त्यांना सांगितलं असं काही करु नका ,पण ते थांबले नाहीत. मग आपणही सांगितलं की, आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा, सुरुवात त्या लोकांनी केली असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केल आहे.