Sanjay Raut :’दत्तक घेतलेल्या नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं’;संजय राऊतांची फडणवीसांवर टीका  

0
Sanjay Raut:'दत्तक घेतलेल्या नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं';संजय राऊतांची फडणवीसांवर टीका  
Sanjay Raut:'दत्तक घेतलेल्या नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं';संजय राऊतांची फडणवीसांवर टीका  

Sanjay Raut : नाशिक शहरात रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. मात्र त्याचं तुम्ही अनाथाश्रम केले आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावरही राऊतांनी टीका केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

नक्की वाचा : वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्यांच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे असणार ?  

‘दत्तक नाशिकचं अनाथाश्रम करून टाकलं’ (Sanjay Raut)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. याबाबत विचारले संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन कुंभमेळा बैठक घेतात. पण नाशिकची काय परिस्थिती झाली आहे ते बघा. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत. तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते. पण तुम्ही नाशिकचे अनाथाश्रम केले आहे. कुंभसाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहेत. पण किती हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्षात कामे होणार आहेत ? सरकारी पैशांची कशा प्रकारे लूट होतेय, हे तुम्ही प्रयागराजमध्ये पाहिले आहे. प्रयागराजमध्ये सगळे टेंडर गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले होते. नाशिकमध्ये सुद्धा काही वेगळे होईल, असं मला वाटत नाही,असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

अवश्य वाचा :  ‘कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय’- माणिकराव कोकाटे

‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा’ (Sanjay Raut)

लाडकी बहीण योजनेत सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या नावाने आर्थिक घोटाळा झाला आहे. अजित पवार यांनी याचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनेक लाडक्या भावांनी स्वतःच्या नावात बदल करून करोडो रुपये लुटले आहेत. अर्थ खात्यातून हे पैसे गेले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा,असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.