Sant Eknath Maharaj : शेवगाव : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पैठणहून पंढरपुरकडे (Pandharpur) निघालेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या (Sant Eknath Maharaj) पालखीचे शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा : ‘आळंदीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नाही’ – देवेंद्र फडणवीस
ग्रामस्थांनी पालखीचे केले उस्फूर्तपणे स्वागत
श्री क्षेत्र पैठणचे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची पालखी वैष्णवांचा मेळा बरोबर घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली आहे. गगनाला भिडणाऱ्या उंच उंच पताका, झेंडे, टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथाचा गजर करीत वैष्णवांचा मेळा ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पंढरीच्या दिशेने निघालेला आहे. शेवगाव तालुक्यातील हातगाव, बोधेगाव, बालमटाकळी, बाडगव्हाण, लाडजळगाव येथील ग्रामस्थांनी पालखीचे उस्फूर्तपणे स्वागत केले.
अवश्य वाचा : माळीवाडा बस स्थानकात प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाचे दुर्लक्ष
भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्था (Sant Eknath Maharaj)
बालमटाकळी येथे गेल्या अनेक वर्षापासूनची पालखीला गावातून पायघड्या टाकून गावातील सर्व महिला मंडळ ह्या आपआपल्या दारात सडा, रांगोळी टाकून टाळ, मृदुंगाच्या गजरात येथील भाविक मिरवणूक काढून पालखी दर्शनासाठी मारुतीच्या मंदिरात ठेवली जाते. आलेल्या भाविकांना ग्रामस्थांकडून जेवणाची व्यवस्थाही केली जात असून पालखी वाजत-गाजत बाडगव्हाण, लाडजळगाव मार्ग पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ केली जाते. यावेळी बालमटाकळी सह पंचक्रोशीतील भाविक भक्त पालखी रवाना करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.