Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत

Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत

0
Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत
Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत

Sant Nivruttinath Maharaj : संगमनेर : शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) पालखीचे नगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी या पालखीचे स्वागत व पूजन केले.

अवश्य वाचा : लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली;दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

पालखीचे सुमारे 20 हजार वारकऱ्यांसमवेत आगमन

पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे 20 हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी माजी आमदार डॉ. तांबे यांनी पालखीचे पूजन केले. याप्रसंगी समवेत अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, डॉ. दत्तात्रय गडाख, त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, सोपानराव येलके, दौलत गडाख, ज्ञानेश्वर मुंगसे आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत
Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा’- संजय राऊत

हरिनामाचा गजर करत नगर जिल्ह्यात प्रवेश (Sant Nivruttinath Maharaj)

रिमझिम पावसात सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात नगर जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.

Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत
Sant Nivruttinath Maharaj : संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नगर जिल्ह्यात उत्साहात स्वागत


यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात. भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले. हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना दरवर्षी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करतात. पावसाळी अधिवेशन असल्याने आमदार थोरात हे मुंबईत आहेत, यावेळी त्यांनी दूरध्वनी वरून वारकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here