Satyajeet Tambe : शेवगाव : शिक्षण (Education) आणि सहकाराच्या (Cooperation) माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. पर्यायाने त्यांना क्षमतेपेक्षाही कमी संधी मिळाल्या. व्यवस्थेविरुद्ध काम करणारी किंवा आवाज उठवणारी कृती ही बंडखोरी ठरवली जाते. मात्र, अशी बंडखोरी सकारात्मक असते. बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. अशा स्वभावाच्या आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याने समाज उभारणीच मोठ कार्य उभा राहिल्याचे गौरव उद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी केले.
नक्की वाचा : विशेष पोलीस पथकाचा मटका बुकींवर छापा; २२ आरोपींवर कारवाई
‘आठवणीतले आबासाहेब’ या पुस्तकाचे प्रकाशन
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०६ व्या जयंती सोहळ्या निमित्त आज (ता. २८) आयोजित ‘आठवणीतले आबासाहेब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रम तांबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पाटील, राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना मंडळाचे सदस्य संदीप वाकचौरे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधर काकडे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा काकडे, शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मण बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे, जगन्नाथ गावडे, ॲड.सुभाष भोर आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आमदार तांबे म्हणाले की, (Satyajeet Tambe)
गोरगरिबाच्या विकासासाठी आबासाहेबांनी गावोगावी शिक्षण संस्था उभारल्या, वसतिगृह काढली, पाणी प्रश्नावर काम केले आणि सत्यनिष्ठ भूमिकेचा अंगीकार करत तळागाळातील माणसाच्या भल्यासाठी अव्याहतपणे कार्य उभा केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या सुधारणेसाठी दिल्याचे मधुर फळे आज अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारे अनेक जण अनुभव आहेत असेही त्यांनी सांगितले.