नगर : राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रकासाठी जोडावं लागणार ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क (Stamp Duty)आता माफ करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.
नक्की वाचा : संतोष देशमुखांच्या हत्येचे ‘क्रूर’ फोटो समोर येताच महाराष्ट्र सुन्न
विद्यार्थी व पालकांचा खर्च वाचणार (Stamp Duty)
आता एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे. दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा खर्च जवळपास ३ ते ४ हजार रुपयांचा असतो. या निर्णयामुळे आता हा खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अवश्य वाचा : महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
कोणत्या प्रतिज्ञापत्रांसाठी निर्णय लागू होणार ?(Stamp Duty)

राज्यात कोणतंही शासकीय काम असो किंवा सरकारी परीक्षेचा अर्ज, नागरिकांना त्या कामासाठी जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र अशी प्रतिज्ञापत्रके जोडावी लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसोबत एक ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरावे लागते. विशेषत: दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना ही सर्व प्रमाणपत्र लागतात. या प्रतिज्ञापत्रकांसाठी लागणारा तीन ते चार हजार रुपयांचा खर्च आता वाचणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट,राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी हा निर्णय लागू करण्यात आला.