Police Transfer:राज्य सरकारचा मोठा निर्णय,१११ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या 

0
Police Transfer:राज्य सरकारचा मोठा निर्णय,१११ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या 
Police Transfer:राज्य सरकारचा मोठा निर्णय,१११ पोलीस निरीक्षकांच्या केल्या बदल्या 

Police Transfer : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) सूचना दिल्यानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या (Transfer) करा,अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत तब्बल १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

नक्की वाचा : मोठी बातमी!मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Police Transfer)

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर राज्यसरकारने हा मोठा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यापैकी ११ पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.

अवश्य वाचा : प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला खडेबोल (Police Transfer)

लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रासह इतर ४ राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. निवडणूक आयोगाने आता राज्य सरकारला सूचना दिल्यानंतर राज्य सरकारने आता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here