Sujay Vikhe : मोदींच्या विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही : सुजय विखे

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe : मोदींच्या विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही : सुजय विखे

Sujay Vikhe : नगर : देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचेच वातावरण आहे आणि जनताही त्यांच्याच बाजूने कौल देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा: काँग्रेसमध्ये राहून सर्व निष्ठा शरद पवारांप्रती वाहिल्या; विनायक देशमुखांचा बाळासाहेब थाेरातांवर हल्लाबाेल

शेवगावमधील घोटण येथे कार्यकर्ता संवाद मेळावा (Sujay Vikhe)

येत्या ७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर जिल्ह्यात येणार आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीचा मेळावा सुरू असताना महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रचार सभांची गती वाढवली आहे. महायुतीच्यावतीने शेवगाव तालुक्यातील घोटण येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले याच्यासह अंबादास कळमकर, संजय कोळगे, बबन भुसारी आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: नरेंद्र माेदींची मंगळवारी नगरमध्ये ताेफ धडाडणार; कुणावर निशाणा साधणार

डॉ. विखे यांनी सांगितले की (Sujay Vikhe)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाचा गतीमान विकास केला आहे. अनेक योजनांच्या मार्फत त्यांनी तळागळातील लोकांचा विकास करून दाखविला असून ३० कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून मुक्त केले. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली आहे. यामुळे देशा परदेशातून अनेक नामांकित कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंरराष्ट्रीय संबंध मजबूत केले. यामुळे आज जगात भारताचा डंका वाजत आहे. येणाऱ्या काळात विकसीत भारताचे स्वप्न त्यांनी देशाला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here