Sujay Vikhe Patil : माेदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा; सुजय विखेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sujay Vikhe Patil

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे. आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केला आहे. यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister) करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

मोदींची तिसऱ्या पर्वाकडे वाटचाल (Sujay Vikhe Patil)

विखे जामखेड येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे, रवी सुरवसे, बाळासाहेब भोसले, राजू भोसले आदी उपस्थित हाेते. यावेळी डॉ. विखे म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व, कार्यशैली, निर्णयक्षमता, दूरदृष्टी, विकासाचा ध्यास आणि देशाप्रती असलेली कळकळ देशाने पाहिली आहे. यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळण्याची संधी जनतेकडून दिली जाणार आहे. मोदींची तिसऱ्या पर्वाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. त्याचा आपल्याला हिस्सा व्हायचा आहे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.  

नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका

जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी (Sujay Vikhe Patil)

यावेळी सभेला उपस्थित असणारे आमदार राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहचविला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यातील दळण वळणाच्या सेवा सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोगार देण्याचे काम केले आहे. त्यांनी जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणण्याचे काम केले. यामुळे असा खासदार येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करेल. यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे गरजचे आहे. असे आवाहन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here