Mahakumbh Stampede : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात (Kumbhmela)‘मौनी अमावास्ये’च्या दिवशी चेंगराचेंगरीची दुर्घटना (Stampede accident) होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. या घटनेननंतर आता महाकुंभ मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्याच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार (Refusal) दिला आहे.
नक्की वाचा : धनंजय मुंडे व वाल्मिक कराड निवडणुकीपूर्वी भेटायला आले;मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
‘महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी’ (Mahakumbh Stampede)
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत देशभरामधून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुरक्षा उपाययोजना आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात यावीत,असे आदेश दिले जावे,याबाबतची एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याला मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
अवश्य वाचा : …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य
उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला सांगितलं की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान,या याचिकेत केंद्र आणि राज्य सरकारला एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली होती. जेणेकरून कुंभमेळ्यात भाविकांना सुरक्षित वातावरण मिळू शकेल. याचिकेत असंही म्हटलं की, महाकुंभात चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे देण्याची विनंती करण्यात आली आहे.
नेमकं त्या दिवशी काय घडलं ? (Mahakumbh Stampede)
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे. मात्र, या कुंभमेळ्यात ‘मौनी अमावास्ये’च्या दिवशी संगमावर स्नान करण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत ६० जण जखमी झाले होते. रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामधील काही भाविकांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.