Teacher Bag : विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखी शिक्षकाने तयार केली स्वतःची टिचर बॅग

0
Teacher Bag : विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखी शिक्षकाने तयार केली स्वतःची टिचर बॅग
Teacher Bag : विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखी शिक्षकाने तयार केली स्वतःची टिचर बॅग

Teacher Bag : नगर : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Education) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तसेच महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (एससीईआरटी),पुणे यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एसक्युयुएएएफ अभियान अंतर्गत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल (Dr. Amol Bagul) यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तरासारखे शिक्षकाचेही (Teacher) टिचर-बॅग (Teacher Bag) हे दप्तर तयार केले आहे.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

५१४ पेक्षा अधिक शालेय दस्तऐवजांचा समावेश

शिक्षक डॉ.बागुल यांचे वडील सुभाष बागुल यांनी शिलाई केलेली अंदाजे १००० किलो वजनाची, ५ फूट बाय ४ फुट आकाराची प्रतीकात्मक निर्मिती २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमधील महत्वपूर्ण ५१४ पेक्षा अधिक शालेय दस्तऐवजांचा समावेश असलेली टि-बॅग शिक्षणातून सक्षम राष्ट्र उभारणीचा संदेश देते. कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, आयएसओ व विविध जागतिक मानांकनासाठी डॉ.बागुल यांनी ही शैक्षणिक निर्मिती पाठवली आहे.

अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

टीचर बॅगमधून या शैक्षणिक घटकांचे जतन होणार (Teacher Bag)

“शालेय अभिलेख विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळवण्यापासून ते शाळेतून बाहेर पडण्यापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती ठेवतात. या नोंदींमधून विद्यार्थ्यांना त्यांची उपस्थिती, निकाल, मूल्यांकन व इतर शालेय महत्वपूर्ण बाबी यासारखी माहिती मिळते. टीचर बॅगमधून या शैक्षणिक घटकांचे पद्धतशीरपणे जतन होणार आहे,” असे प्रतिपादन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारीणी सदस्य तथा शालेय समिती अध्यक्ष ॲड किशोर देशपांडे यांनी केले.

“१०२ पटसंख्येचा वर्गशिक्षक म्हणून काम करताना वर्गातील विद्यार्थ्यांविषयीचे शालेय अभिलेख व कागदपत्रेयांचे टिचर बॅग द्वारे केलेले व्यवस्थापन प्रशासकीय कामकाज व इतर बाबींसाठी महत्त्वाचे ठरते.” असे डॉ बागूल यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव सुरेश क्षीरसागर, खजिनदार संजय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य सुनील जोशी, स्वप्निल कुलकर्णी, ॲड. वेद देशपांडे, विषय तज्ज्ञ सुलभक प्रा.अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.