Thane Banner:‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा

0
Thane Banner:‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा
Thane Banner:‘देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत’,ठाण्यातील बॅनरची राज्यभर चर्चा

Thane Banner : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. त्यातच ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’ अशा आशयाच्या या बॅनरची (Banner) राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी या बॅनरवर अजून एक ओळ आहे. त्यावरून एकूणच हा प्रकार काय हे समोर येते. दोन मराठी वाघाने एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे,असा मजकूर ठळकपणे त्यावर नोंदवण्यात आला आहे. हा बॅनर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना डिवचण्यासाठी लावण्यात आले आहे.

नक्की वाचा : ‘दिवा विझताना मोठा होतो,तसं जयंत पाटलांचं झालंय’- गोपीचंद पडळकर  

बॅनरवर नेमकं काय ? (Thane Banner)

या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. ठाण्यातील तिनं हात नका येथे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी तुषार दिलीप रसाळ कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप) असा मजकूर त्यावर आहे. मा.देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत,दोन मराठी वाघाने एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे,असा मजकूर तुषार रसाळ यांच्या या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. हा बॅनर मंत्री नितेश राणे यांच्या धाराशिवमधील वक्तव्यानंतर लावण्यात आला आहे.

अवश्य वाचा : नोकरावर प्रेम,नवऱ्याचा गेम! सोनमनेच रचला राजाच्या हत्येचा कट   

नितेश राणे यांचे वक्तव्य काय ? (Thane Banner)

धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांनी शिंदे सेनेवर टीका केली होती. ‘सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, सगळ्यांनी लक्षात ठेवा’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांचा रोख अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होता. त्यांच्या वक्तव्यामुळे पुढे प्रकाश महाजन आणि नारायण राणे हा महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यापूर्वी तुळजापूरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची त्यांनी खिल्ली उडवली होती. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे २० आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शेलक्या शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका केली होती.