Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची महायुतीवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची महायुतीवर घणाघाती टीका

0

Uddhav Thackeray : नगर : महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) महाविकास आघाडीचा आपण प्रचार करणार असून या निवडणुकीत भाजपाचा (BJP) सुपडा साफ होईल, अशी प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याचे राज्यपाल पद भूषविलेले आणि एकेकाळी भाजपचे नेते असलेल्या सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

अवश्य वाचा: भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

सत्यपाल मलिक म्हणाले,

“विधानसभा निवडणुकीत भाजपाला नुसताच फटका बसणार नाही तर या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे कुणाला काळजी करण्याची गरज नाही.”

नक्की वाचा: पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका! नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

महायुती सरकारवरही जोरदार टीका (Uddhav Thackeray)

सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरही जोरदार टीका केली. माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, विधानसभेचे जे निकाल येतील, त्याच्यावरून संबंध देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघणार आहे, असा अंदाज त्यांनी वर्तविला.

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यादरम्यान ही लढाई होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here