Uddhav Thackeray:’बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’;उद्धव ठाकरेंचा संताप

0
Uddhav Thackeray:'बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत';उद्धव ठाकरेंचा संताप
Uddhav Thackeray:'बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत';उद्धव ठाकरेंचा संताप

Uddhav Thackeray: बदलापूरच्या घटनेआडून राजकारण होत असल्याचा विचार करणारे विकृत विचार सरणीचे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात कडेवर बसणाऱ्या मुलींवर अत्याचार होत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरही त्यांनी भाष्य केल आहे. बदलापूरमधील(Badalapur Crime) एका शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अत्याचारानंतर बदलापूरकर संतप्त झाले. या घटनेवर प्रतिक्रिया देत आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे.

नक्की वाचा :  ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा  

‘२४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा’ (Uddhav Thackeray)

“राजकारण आहे म्हणणारेही विकृत आहेत” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.”सुरक्षित बहीण ही सरकारची प्राथमिकता आहे. जर बहीण सुरक्षित असेल तरच लाडकी बहीण योजना ही आणता येईल. २४ ऑगस्टला महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी विनंती करतो की, आपण जात-पात, धर्म हे सर्व बाजुला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हा. हा बंद माझ्या बहिणींसाठी असल्याचे ठाकरेंनी सांगितल

अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!फळ आणि फुलांच्या लागवडीसाठी मिळणार अनुदान

नराधमांचं सरकार आहे का? उद्धव ठाकरेंचा सवाल  (Uddhav Thackeray)


“आपण जागृत आहोत हे दाखवण्यासाठीचा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवू शकतो. उद्रेकाला वाचा फोडण्यासाठीचा हा बंद आहे. राज्यभर निषेध होत असताना मुख्यमंत्री कुठे होते? ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून ही योजना आणली आहे. पण ही विकृती आहे, दुष्कृत्य आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं यात राजकारण कधीपासून यांनी वाटायला लागलं.” “बातमी वाचण्याचं धाडस माझ्यात नाही. ही विकृती आली कुठून? मुलीच्या गर्भवती आईला १२ तास बसून ठेवलं, तिला १०२ ताप आहे, रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे सरकार कोणाचं आहे, नराधमांचं सरकार आहे का? आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते कोणाच्या बाजुने आहेत?,हे असंवेदनशील सरकार आहे. जर त्यांना वाटत असेल यात राजकारण आहे तर असं म्हणणारे सुद्धा विकृत आहेत “असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here