Vaishali Karmarkar : भारत सर्वांवर मात करत प्रगती साधत आहे : वैशाली करमरकर

Vaishali Karmarkar : भारत सर्वांवर मात करत प्रगती साधत आहे : वैशाली करमरकर

0
Vaishali Karmarkar : भारत सर्वांवर मात करत प्रगती साधत आहे : वैशाली करमरकर
Vaishali Karmarkar : भारत सर्वांवर मात करत प्रगती साधत आहे : वैशाली करमरकर

Vaishali Karmarkar : नगर : भारताला (India) वारंवार रक्तबंबाळ करण्यामागे पाकिस्तान (Pakistan) जेव्हढा जबाबदार आहे तेव्हढेच त्या मागे जगातील काही शक्तींची रणनीती आहे, अशी कारस्थाने होतच रहाणार आहेत. मात्र, आपण हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार.. याप्रमाणे सर्वांवर मात करत भारत आपले काम योग्य पद्धतीने करून प्रगती साधत आहे, असे प्रतिपादन देशाच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सल्लागार (International Cultural Consultant) वैशाली करमरकर (Vaishali Karmarkar) यांनी केले.

नक्की वाचा : संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचे गंभीर आरोप

जागतिक अर्थकारणातील सांस्कृतिक आक्रमणे

विचार भारती आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प वैशाली करमरकर यांनी जागतिक अर्थकारणातील सांस्कृतिक आक्रमणे या विषयाने गुंफले. यावेळी प्रसिद्ध माध्यमकर्मी डॉ.उदय निरगुडकर यांनी वैशाली करमरकर यांची प्रकट मुलाखत घेतली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माऊली सांस्कृतिक सभागृहाचे अध्यक्ष दिनकर घोडके होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, मनीषा मुळे व भावना लांडगे यांनी पाहुण्याचे सत्कार केले. व्याख्यानाला भर पावसातही मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

आधुनिक युद्ध पद्धती व कथ्थ्यांचे युद्ध यावर भाष्य (Vaishali Karmarkar)

यावेळी वैशाली करमरकर यांनी सखोल विज्ञानावर आधारीत व पुराव्यानिशी देशातील व जगातील घटनांचा पट अगदी सहज व सोप्या भाषेत संवाद साधत उलगडला. यातून अनेक चित्तथरारक घटना, जागतिक घडामोडी मागील अदृश्य शक्ती, आधुनिक युद्ध पद्धती व कथ्थ्यांचे युद्ध यावर भाष्य करून उपस्थितांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली.

वैशाली करमरकर पुढे म्हणाल्या, पाकिस्तानने जर शस्त्रसंधी टिकवली नाहीतर हाताने पाकिस्तान स्वतःची कबर खोदत आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मधून आपली सॉफ्ट, स्मार्ट व हार्ड पॉवर या तिन्ही शक्तींचा उत्तम मिलाफ करून दाखवला आहे. पाश्च्यात्य शक्तींनी सॉफ्ट पॉवर वापरून भारताला खिळखिळे करण्याचे जे कारस्थान केले होते त्यास आपण चतुर, मुस्सदी व दूरदर्शीपणे चोख उत्तर दिले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमे भारताची खोटी प्रसिद्धी करत असल्याने जगभर सर्वपक्षिय शिष्ठमंडळ पाठवून भारताने आपल्या सॉफ्ट पॉवरचा षटकार मारला आहे.

अमेरिका खूप बलाढ्य असल्याने युद्धखोर आहे. स्वतः कडे असलेल्या शक्तीमुळे तो जगातील प्रत्येक युद्धात जाणून बुजून हस्तक्षेप करत आहे. युद्ध पद्धती बदलत आहे. आता पाचव्या युद्ध पद्धती नुसार भारतावर धर्म व पंथावर, मनोविज्ञानीक युद्ध, सायबर वॉर असे हल्ले जाणूनबुजून भारतावर केले जात आहेत. २०१४ ते १८ दरम्यान परकीय शक्तींनी देशातील निवडणुकांमध्ये बदल घडवून आणणे, अचानक कन्हैया कुमार सारखे व्यक्ती उगवले व मावळते, शबरी मलाई, शनिशिंगणापूर प्रकरणी स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक या प्रकरणांना जाणीवपूर्वक वेगळा रंग दिला गेला. त्यामुळे जोवर आपण सजग राहून वॉशिंग्टन पोस्ट सारख्या माध्यमांवर व त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे. तरच हे देश विरोधी कट कारस्थान थांबवू शकू. सर्वच जबाबदारी सरकारची नाही. आपणही काही जबाबदारी घेतली पाहिजे. आता अत्याधुनिक एआय टेक्नोलॉजीच्या युद्ध पद्धती पुढे येत आहे. खोटे कथ्थ्य पसरवणे हेही या नव्या युद्धाचाच भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विशारद पेटकर यांनी केले. प्रा.अशोक सागडे यांनी आभार मानले. शांती मंत्राने सांगता झाली.