Varkari : नगर : भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) अतिथी देवो भव ला जास्त महत्व आहे. घरी आलेला पाहुणा हा ईश्वरी रुपाने अवतरतो असे आपण समजतो. त्याप्रमाणे आषाढी वारीला (Ashadhi Wari) पांडुरंगाला भेटण्यासाठी लाखो भाविक दिंडीतून जातात. या वारीत गरीब-श्रीमंत, जात-पात, रंगरुपाचा भेद नसतो. महाराष्ट्रातील संतांचे विठोबा हे दैवत आहे. अशा या वारीत आगळी-वेगळी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या वारकर्यांच्या (Varkari) सेवेतच पांडुरंगाचे दर्शन होते. या कष्टकर्यांच्या जीवनातील संकटे दूर होऊ दे ! त्यांच्या जीवन सुख-समृद्धी होऊ दे अशी प्रार्थना आज विठ्ठूरायाच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले (Avinash Ghule) यांनी केले.
अवश्य वाचा : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू; पाथर्डी तालुक्यातील घटना
जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने पादुकांचे पुजन
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तनाथ महाराज यांच्या पालखीतील पादुकांचे पुजन जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेविका निता घुले, संजय घुले,चैतन्य घुले,उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, शेख रज्जाक शेख लाल, अशोक बाबर, विष्णुपंत म्हस्के, अॅड.वैभव कदम, सतीश शेळके, अनुरथ कदम, बहिरु कोतकर, रविंद्र भोसले, बबन आजबे, नवनाथ बडे, संजय महापुरे, मंदाबाई सूर्यवंशी, रतनबाई आजबे, कमलबाई ढाणे, लताबाई बरेलिया, राहिबाई गायकवाड, नारायण गिते, लक्ष्मण वायभासे, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, विष्णू ढाकणे, मच्छिंद्र दहिफळे, राजू चोरमले, सुनिल गर्जे, राहुल घोडेस्वार, बाबासाहेब गिते, आदिनाथ चेके, अशोक टिमकरे, शेख उबेद अब्दुल गणी, महादेव गर्जे, नवनाथ महानोर, देवीदास बनसोडे, चांगदेव कुसळकर, मच्छिंद्र गिरी, अंबादास उगलमुगले, बबन सुसे, सचिन ठुबे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे, युवराज राऊत, आसिफ कादरी, बाबासाहेब किर्तने, डॉ.कवळे, देवकर, भगवान सांगळे, नितीन बडे, दिपक जुम्मीवाले, बाळासाहेब वडागळे, अर्जुन बाबर, बाबासाहेब काळे, आदि उपस्थित होते.
नक्की वाचा : शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार
हमाल पंचायतच्यावतीने दरवर्षीप्रमाणे तीन दिवस व्यवस्था (Varkari)
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून येणार्या श्री निवृत्तीनाथ दिंडीतील वारकर्यांची हमाल पंचायतच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तीन दिवस व्यवस्था करण्यात आली होती. या दिंडीचे स्वागत जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केल्यानंतर मार्केट यार्ड येथे ही दिंडी आल्यानंतर मुक्कामी दिंडीचे अहिल्यानगरमधील अनेक भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्या दिवशी वारकर्यांसाठी उपवासाचे पदार्थ देण्यात आले. दुसर्या दिवशी संजिवन समाधी सोहळा पार पडला. यावेळी हभप जयंत महाराज गोसावी यांचे किर्तन झाले. यावेळी ह.भ.प.मोहन महाराज बेलापुरकर, संस्थानचे अध्यक्ष अॅड.सोमनाथ घुटेकर, आमदार संग्राम जगताप आदि उपस्थित होते. हमाल पंचायतच्यावतीने शिपी आमटी-भाकरीचा प्रसाद वारकर्यांना देण्यात आला. यासाठी 100 पेक्षा जास्त महिला कामगारांनी सेवा दिली. तिसर्या दिवशी घुले परिवाराच्या हस्ते विधीवत महापुजा करुन पालखी पंढरपुरकडे प्रस्थान झाले. यावेळी प्रातांधिकारी सुधीर पाटील, मनपा आयुक्त यशवंत डांगे, तहसिलदार संजय शिंदे, आदिंसह अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, कोतवालीचे पो.नि.प्रताप दराडे आदिंनी पादुकांचे दर्शन घेतले. व व्यवस्थेविषयीचा आढावा घेतला.
या दिंडीच्या स्वागतासाठी गेल्या तीन दिवसांपासून हमाल पंचायतचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. या दिंडीतील वारकर्यांची चहा, नाष्टा, जेवण, राहण्याची सुविधा, औषधोपचार आदिंसाठी पदाधिकारी, व्यापारी, हमाल-मापाडी, कष्टकर्यांनी आपल्या घरातील कार्य असल्याप्रमाणे या वारकर्यांची सेवा केली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दिंडीतील वारकर्यांना भावपुर्ण निरोप देण्यात आला. यावेळी बाजार समिती, जिल्हा प्रशासन, पोलीस दलाचे हमाल पंचायतच्यावतीने विशेष आभार मानण्यात आले.