
Vijay Wadettiwar : राज्यात लाडकी बहीण योजना (Ladki bahin Yojana) लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का ? असा संतप्त सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्याला कुटुंबात आधार नाही,अशा महिलांना केंद्रसरकार १५०० रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता.मात्र दीड हजारात घर चालते का? असेही ते म्हणाले.आता लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी आता फक्त ५०० रुपयेच देणार्या सरकारची कीव येत आहे. केंद्राकडुन पैसे मिळतात म्हणून पैसे कमी करणे हे चुकीचे असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणालेत.
नक्की वाचा : मोठी बातमी! संभाजी भिडेंवर भटक्या कुत्र्याचा हल्ला
‘शिक्षक भरती घोटाळ्यात उल्हास नरडला बळीचा बकरा केला’ (Vijay Wadettiwar)
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की,नागपुरातील ५८० शिक्षक भरती घोटाळ्यात उल्हास नरडला बळीचा बकरा करत आहे.अंतिम निर्णय हा फाईलच्या चौकशीच्या शेवटी असतो. खालचे चोर सोडून नरडचा राजकीय बळी घेतला जात आहे. यात अनेक शाळा सत्ताधारी यांचा आणि जळवळच्या लोकांच्या आहे. संस्थाचालक यांनी मान्यता दिल्यावर उपसंचालक यांच्याकडे जातो. त्यामुळं खाली चुकीचे झाले असल्याची टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर विभागात शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ते बोलत होते.
अवश्य वाचा : ‘सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ -नरेंद्र मोदी
‘नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी‘ (Vijay Wadettiwar)
उल्हास नरड याने उलटपत्र देऊन चौकशीची मागणी केली.यापूर्वी कारवाई झालेला डोरलीकर कोणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहीत आहे. या प्रकरणी SIT चौकशी करावी. विभागीय चौकशी होऊ द्या, समिती नेमा, समिती अहवाल आल्यावर कारवाई होत होती.मात्र इथे थेट नरडला अटक करण्यात आली आहे. मागील ५ ते ७ वर्षात सत्ताधारी यांच्या नातेवाईकांच्या संस्था आहे, या संदर्भात SIT ची नेमणूक करा,अशी मागणी करतोय. शिवाय गरज असल्यास न्यायिक चौकशी करा,अशी मागणी ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.