Weather Alert:मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात’या’जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज

0
Weather Alert:मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात'या'जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज
Weather Alert:मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात'या'जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज

Weather Alert : महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून ओसरला आहे.चक्राकार वाऱ्यांची (cyclonic circulation) स्थिती सध्या मध्यप्रदेश व आजूबाजूच्या भागात सक्रीय असल्यानं राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असून आज सहा जिल्ह्यांत यलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला.

नक्की वाचा : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची महिलेकडून तोडफोड

मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा (Weather Alert)

राज्यात चक्राकार वाऱ्यांची सक्रीयता असल्यानं मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसही या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागानं सांगितले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यात आज तीन जिल्ह्यांना जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बीड,लातूर व धाराशिव जिल्ह्याला आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अवश्य वाचा : पीएम किसानचा १८ वा हफ्ता ‘या’दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

येत्या २४ तासात पावसाचा जोर वाढणार (Weather Alert)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा वाढणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर,सांगली तसेच कोकणातील सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज ही देण्यात आलाय. परतीच्या पावसाचा जोर सध्या ओसरत असून ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेपासून पुन्हा एकदा विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. त्यामुळे काढणीला आलेली पिके सहा ऑक्टोबर पर्यंत उरकून घेण्याचं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here