नगर : लाडकी बहीण योजना (ladki bahin Yojana) ही महिलांना सक्षम करण्यासाठी नाही, तर त्यांना लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होती म्हणून आणली. आता ते समाज कल्याण,आदिवासी विभागाचा पैसा वळती करत आहे. आदिवासी विभाग व समाज कल्याणचा पैसा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेसाठी वळवू शकत नाही, तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे. मात्र, सरकार कोर्ट, संविधान हे बाजूला सारून गोंधळ घालत आहे. लाडक्या बहिणींना सरकारने चटक लावलीय,अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Congress leader Yashomati Thakur) यांनी सरकारवर केली आहे.
नक्की वाचा : मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होणार ?
‘सरकारला महिलांना सक्षम करायचं नाही’ (Yashomati Thakur)
राज्यात ५० लाख लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरविल्यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सरकारला महिलांना सक्षम करण्याचं काम करायचं नाही. आज पन्नास लाख महिला अपात्र केल्या. येणाऱ्या काळात आणखी महिला ते अपात्र करणार आहेत.
अवश्य वाचा : ‘गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल’;संजय राऊतांची टीका