1975 Emergency : नगर : स्वातंत्र्योत्तर काळातील एक काळ रात्र म्हणून ज्या पर्वाचा उल्लेख करावा लागेल तो काळ म्हणजे आणीबाणीचे (1975 Emergency) ते २० ते २२ महिने. आणीबाणी काळात सर्व मिसाबंधू हे देशभक्तीच्या ध्येयाने वेडे झाले होते. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच हे आणीबाणीचे पारतंत्र दूर झाले. ह्या इतिहासाची (History) आठवण यासाठी ठेवायची, कारण ज्यांनी देशावर दुसरे पारतंत्र्य लागले, ज्यांनी खऱ्या देशभक्तांचा छळ करत अतोनात अत्याचार केले. अशांचे हे कृत्य नव्या पिढी समोर आलेच पाहिजे. हा काळा इतिहास कदापि विसरता कामा नये. शहर भाजपने (BJP) मिसा सत्यागाहींचा केलेला सन्मान हा त्यांच्या देशभक्तीचा सन्मान आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अशी निस्वार्थ देशभक्ती बाळगावी, असे आवाहन रा.स्व.संघाचे (RSS) राज्याचे वैचारिक प्रबोधन प्रमुख राजाभाऊ मुळे यांनी केले.
नक्की वाचा : हरिश्चंद्रगड, रतनगड, सांधण दरी परिसरात पर्यटनास तात्पुरती बंदी
आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसा सत्याग्रहींचा सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते राजाभाऊ मुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी अध्यक्ष महेंद्र गंधे, ज्येष्ठ मिसाबंदी सत्याग्रही कांतिलाल सुराणा, नरेंद्र कुलकर्णी, नंदू जोशी, मोहन नातू आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शहरातील २७ मिसाबंदी सत्याग्रही व हयात नसलेल्यांच्या नातेवाइकांचा सन्मान करण्यात आला. भारतमातेचा जयजयकारात सर्वांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुष्पवृष्टी व सन्माने सर्व मिसाबंदी सत्याग्रही भारावले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती लावून आणीबाणीचा निषेध केला.
अवश्य वाचा : सीएकडून व्यवसायिकाची ३८ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अनिल मोहिते म्हणाले, (1975 Emergency)
मीसाबंधू सत्याग्रही हे लोकशाहीचे खरे संरक्षक आहेत. २५ जून १९७५ या दिवशी काँग्रेसने देशात आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला. यावेळी देशात लाखो देशभक्तांना तुरुंगात डांबून अतोनात अत्याचार केले. पण सर्व देशभक्तांनी काँग्रेसच्या सरकारचे हे अत्याचार सहन केले पण सरकारची माफी मागितली नाही. अशा खऱ्या देश भक्तांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून उतराई होणे हे आपले कर्तव्य आहे. इंग्रजांपेक्षाही कॉंग्रेसच्या सरकारचे हे अत्याचार भयानक होते. नव्या पिढीला या काळ्या दिवसांची सर्व ईत्तंभूत माहिती तसेच काँग्रेसने केलेल्या पापाची माहिती कळणे आवश्यक आहे. २०१४ साली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकतंत्राचे रक्षण करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे देशात आता सुदृढ लोकशाही नांदत आहे. राज्य सरकार या मीसाबंदी सत्याग्रहींचा शासनाच्या वतीने सन्मान करून त्यांना पेन्शनही सुरू केली आहे. हा मोठा बहुमान आहे. मात्र शहरातील अद्याप १३ मीसाबंधू यापासून वंचित आहेत. त्यांना हा शासकीय सन्मान मिळावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवठा करत आहे.
यावेळी मिसा सत्याग्रही नरेंद्र कुलकर्णी, नंदू जोशी व मोहन नातू यांनी आणीबाणीच्या दिवसातील घटनांची कटू आठवणी सांगून त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत सावेडी मंडळ अध्यक्ष सिए ज्ञानेश्वर काळे यांनी केले. सरचिटणीस महेश नामदे यांनी सूत्रसंचालन केले. अशोकराव गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी सभागृहात काँग्रेसद्वारा लागलेल्या आणीबाणीच्या काळा अध्यायाचे ५० वे वर्ष हे जनजागृतीपर प्रदर्शन लावण्यात आले होते.