AI : एआयमुळे जग झपाट्याने बदलले : पोलीस अधीक्षक घार्गे

AI : एआयमुळे जग झपाट्याने बदलले : पोलीस अधीक्षक घार्गे

0
AI : एआयमुळे जग झपाट्याने बदलले : पोलीस अधीक्षक घार्गे
AI : एआयमुळे जग झपाट्याने बदलले : पोलीस अधीक्षक घार्गे

AI : श्रीरामपूर: एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता)(AI) मुळे जग झपाट्याने बदलत आहे. पूर्वी १० वर्षांनी काय होईल, हे सांगता येवू शकत होते. आता वर्षभराने काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे डोळ्यात तेल घालून, डोळे उघडे ठेवून बदलत्या जगाकडे पाहत दक्ष राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी केले आहे.

नक्की वाचा : हिंदी विरोधातील मोर्चाच्या तारखेत बदल; आता निघणार या दिवशी मोर्चा

स्पर्धा परिक्षेसह इतर क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव समारंभ

अखंड मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेसह इतर क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव समारंभ पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ घार्गे बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मिनाताई जगधने या होत्या. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा : अहिल्यानगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई

आपल्या प्रमुख भाषणात सोमनाथ घार्गे म्हणाले, (AI)

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल हा आता दुष्मन झाला आहे. ज्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळवायचे असेल त्यांनी मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास केला तर शक्य आहे. मोबाईलने लोकांमध्ये भ्रम निर्माण केला आहे. मोबाईल नसला तर आभाळ कोसळेल, असे वाटते, परंतु ते खोटे आहे. सध्या लोक फक्त आंघोळीपुरता मोबाईल बाजूला ठेवतात इतके ते त्याच्या आहारी गेले आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे शेतीचे उत्त्पन्न वाढून ते शेतकर्‍यांसाठी वरदान ठरेल परंतु एआयचे काही धोकेही विषद करतांना घार्गे यांनी सांगितले की, फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम हे अवघ्या दोन व तीन कंपन्यांचे आहे. त्याचा प्रत्येकी एक एक मालक आहे. मध्यंतरी काही तास व्हॉटसअ‍ॅप बंद पडले तर सगळेच बेचैन झाले होते. उद्या व्हॉटस्अ‍ॅप या लोकांनी बंद ठेवले तर लोकं एकमेकांशी मारामार्‍या करतील. एका लेखकाच्या पुस्तकाचा दाखला देत घार्गे म्हणाले, जो चमत्कार करतो त्याला आपण देव मानतो. ५० ते ६० वर्षानंतर हे तंत्रज्ञान चमत्कार करतील. पुढच्या दहा वर्षानंतर माणसाच्या हातात मोबाईल नसेल तर शरीरात एक चिफ टाकतील आणि त्याचे स्क्रीन कोणत्या भिंतीवरही दिसू शकेल. त्या चिफमध्ये हार्टरेट, पल्सरेट, शुगर, बीपीसह मोठ्या प्रमाणात फिचर असतील आणि हे सर्व मॉनिटरायझिंग एक कंपनी करेल. हे सर्व अमेरिकत बसलेल्या दोन तीन लोकांच्या हातात असेल.

उद्या त्यांना वाटले तर ते आठ दिवस व्हाटॅस्अप बंद करतील. उद्या त्या चार पाच लोकांना (होमोडिओस) वाटले की लोकसंख्या कमी करायची तर ते एक प्रोग्राम टाकतील. त्यामुळे अनेक लोकांची शुगर रात्रीतून चिफमुळे एक हजारच्यावर जाईल. रात्रीतून कित्येक लोक मरतील, असे त्या पुस्तकात म्हटले आहे. असे सांगत घार्गे म्हणाले, चुकीच्या माणसाच्या हातात असे तंत्रज्ञान गेले तर त्याचा मोठा धोका होऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या आहारी लोक जात आहे. एवढेच नव्हे तर एआय तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रातील लोकांची कामे एआय करणार असल्याने लोकांच्या नोकर्‍या जात आहे. भविष्यातही अनेक क्षेत्रात नोकर्‍या जाणार आहेत. पूर्वी १० वर्षात कोणत्या क्षेत्रात करीअर करावे हे सांगता येत होते. आता वर्षभराने काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वानी दक्ष रहावे, असे आवाहन यावेळी घार्गे यांनी केले.

यावेळी मिनाताई जगधने, अ‍ॅड. बाळासाहेब आगे, डॉ.शुभांगी लोखंडे, अ‍ॅड. कोमल चौधरी, डॉ. पूजा गागरे, पोलीस उपनिरीक्षक शुभम घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत नागेश सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश कांगुणे यांनी केले. गुणवंतांचा परिचय व माहिती राजेंद्र मोरगे यांनी दिली. तर शेवटी बी.जी.गायधने यांनी आभार मानले.